58 percent votes cast in second phase of polling in Jharkhand 
देश

विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात झारखंडमध्ये 58 टक्के मतदान

वृत्तसंस्था

रांची : झारखंड विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत 58.8 टक्के मतदान झाले. यादरम्यान झालेल्या हिंसाचारात एक नागरिक ठार झाला. नक्षलवाद्यांच्या कारवायाच्या पार्श्‍वभूमीवर आज सकाळी सात वाजल्यापासून कडक बंदोबस्तात मतदानास सुरुवात झाली होती. वीसपैकी 18 मतदारसंघांतील मतदान दुपारी तीन वाजता संपले, तर जमेशदपूर (पूर्व) आणि जमशेदपूर (पश्‍चिम) येथे पाच वाजेपर्यंत मतदान झाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

सात जिल्ह्यांतील 20 मतदारसंघांत आज दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान झाले. यासाठी सुमारे 42 हजार जवान तैनात करण्यात आले होते. यानुसार 260 उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद झाले. त्यात 29 महिलांचा समावेश होता, तर 73 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. सिसाई मतदारसंघात 36 क्रमाकांच्या बूथबाहेर बंदोबस्तासाठी असलेल्या रॅपिड ऍक्‍शन फोर्सच्या जवानाची बंदूक हिसकाविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकावर गोळीबार करण्यात आला. त्यात तो ठार झाला.

दोन्ही पायांनी अपंग; पण पाहा कशी चोरी करतो

या घटनेमुळे संबंधित बुधवारची मतदान प्रक्रिया थांबविण्यात आल्याचे मतदान केंद्र अधिकाऱ्याने सांगितले. त्याचवेळी संतप्त नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली. अन्य एका घटनेत पश्‍चिम सिंघभूम जिल्ह्यात चैसाबा मतदारसंघात नक्षलवाद्यांनी जोजो हातू गावाजवळ रिकामी बस पेटवून दिली. बहारागोरा आणि चैसाबा मतदारसंघात थंडीतही मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र होते. झारखंड विधानसभेचा निकाल 23 डिसेंबरला लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT