देश

एका कोरोनाबाधितामागे ९० जणांचा संसर्ग ‘मिसिंग’;फेब्रुवारीत संसर्ग घटणार 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - देशात कोरोना संसर्गाची आकडेवारी आता खूपच कमी झालेली दिसत असली, तरी मागील वर्षी नोव्हेंबरपर्यंत देशात प्रत्येक एका पॉझिटिव्ह रुग्णामागे ९० जणांना झालेला संसर्ग ओळखता आला नव्हता, अशी माहिती आयआयटी खरगपूर येथील डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर सायन्सचे सदस्य प्रोफेसर मणिंद्र आगरवाल यांनी दिली. 

यासंदर्भात आगरवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘दिल्ली, केरळ या राज्यांत एका संसर्गामागे २५ जणांचा, तर उत्तर प्रदेश व बिहारसारख्या राज्यांत एका मागे ३०० जणांचा संसर्ग ओळखता आला नाही. देशातील कोविड रुग्णांच्या मागील महिन्यात झालेल्या पृथःकरणातून ही माहिती पुढे आली. डिपार्टमेंट ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजीने (डीएसटी) स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीने ही पाहणी केली. या समितीने विकसित केलेल्या भारताच्या आकडेवारी आधारित सुपरमॉडेलमध्ये फेब्रुवारी २०२१पर्यंत कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येईल, असे सांगितले आहे. सप्टेंबरमधील आकडेवारीनुसार एका पॉझिटिव्ह रुग्णामागे ६० ते ६५ संसर्ग ओळखता आला नव्हता.’’ 

ते पुढे म्हणाले, ‘‘देशात एक पॉझिटिव्ह रुग्णामागे ९०, तर इटली आणि ब्रिटनसारख्या देशांत एका रुग्णामागे १० ते १५ रुग्ण ओळखता आले नव्हते. या लोकांची कधीच चाचणी केली गेली नाही, कारण त्यांच्यात कोणतीही लक्षणे आढळली नव्हती. आमच्या मॉडेलनुसार, दिल्लीतील तिसरी लाट सर्वांत मोठी असली, तरी संसर्गाचा आकडाही तेवढाच होता. मात्र, दुसऱ्या लाटेत एक केसमागे ४३ जणांचा संसर्ग ओळखता आला नव्हता, तर तिसऱ्या लाटेत २१ जणांचा. दिल्ली सरकारने चाचण्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढविल्याने असे घडले,’’ असे आगरवाल म्हणाले. 

डीसीटीच्या या तज्ज्ञ समितीमध्ये आगरवाल यांच्याबरोबर आयआयटी हैदराबादचे प्रोफेसर एम. विद्यासागर, सीएमसी वेलौरचे डॉ. गगनदीप कांग, आयआयटी बंगळूरचे प्रोफेस बिमन बागची, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचे प्रोफेसर अरुप बोस व शंकर पॉल व संरक्षण मंत्रालयातील लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांचा समावेश होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT