Amit Shah
Amit Shah esakal
देश

Amit Shah : 'अमेरिका, इस्रायलनंतर भारत असा देश आहे, ज्याच्याशी पंगा घेण्याचं धाडस कोणीच करू शकत नाही'

सकाळ डिजिटल टीम

आम्हाला प्रत्येक देशाशी मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत, परंतु त्याचवेळी आम्ही कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही.

अमेरिका (America) आणि इस्रायलनंतर (Israel) भारत असा देश आहे, ज्याच्याशी पंगा घेण्याचं धाडस कोणी करू शकत नाही, असा स्पष्ट इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिला.

इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना अमित शाह (Amit Shah) म्हणाले, आज भारताची (India) स्थिती खूप मजबूत आहे. आज जगात कोणीही भारताच्या सीमा आणि लष्कराशी छेडछाड करू शकत नाही. अमित शाहांनी आपल्या भाषणातून शत्रू देशांना हा एकप्रकारचा इशाराच दिलाय.

2014 मध्ये नरेंद्र मोदी (Narendra Modi) पंतप्रधान होण्यापूर्वी भारताकडं संरक्षण धोरण नव्हतं, पण आज ते आहे, असंही शाह म्हणाले. शाह पुढं म्हणाले, 'आज भारत देश स्वातंत्र्यानंतर अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेच्या बाबतीत सर्वात सुरक्षित आहे. कारण, आमची धोरणं स्पष्ट आहेत. आज जगात कोणीही भारताच्या सीमा आणि लष्कराशी छेडछाड करू शकत नाही. मोदीजी पंतप्रधान होण्यापूर्वी संरक्षण धोरण नव्हतं.'

अमित शाह म्हणाले, भारतावरील हल्ल्यानंतर जगाला कळलं की अमेरिका आणि इस्रायलनंतर भारत हा तिसरा देश आहे, ज्याच्याशी पंगा घेण्याचं धाडस कोणी करू शकत नाही. भारत सध्या बाह्य आणि अंतर्गत सुरक्षेच्या बाबतीत सर्वात सुरक्षित देश आहे. आम्हाला प्रत्येक देशाशी मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत, परंतु त्याचवेळी आम्ही कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT