agnipath scheme punjab assembly passed resolution against central government agnipath scheme
agnipath scheme punjab assembly passed resolution against central government agnipath scheme  sakal
देश

पंजाब विधानसभेत 'अग्निपथ' योजनेविरोधात ठराव मंजूर

सकाळ डिजिटल टीम

Agnipath Recruitment Scheme : देशभरात विरोध होत असलेल्या केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेबाबत पंजाब सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. पंजाब विधानसभेने गुरुवारी केंद्राच्या अग्निपथ संरक्षण भरती योजनेच्या विरोधात ठराव मंजूर केला आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाचे दोन आमदार अश्विनी शर्मा आणि जंगी लाल महाजन यांनी या प्रस्तावाला विरोध केला. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी हा प्रस्ताव सभागृहात मांडला.

या प्रस्तावावरील चर्चेत मुख्यमंत्री मान म्हणाले की, अग्निपथ योजनेचा मुद्दा लवकरच पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही योजना देशातील तरुणांच्या विरोधात आहे. विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे आमदार प्रताप सिंह बाजवा यांनी अग्निपथ योजना मागे घेण्याची मागणी केली. अकाली दलाचे आमदार मनप्रीत सिंग अयाली यांनीही या प्रस्तावाला पाठिंबा देत ही योजना मागे घेण्याची मागणी केली.

विशेष म्हणजे, लष्कर, नौदल आणि हवाई दलात चार वर्षांच्या करारावर 17 ते 21 वर्षे वयोगटातील तरुणांची भरती करण्यासाठी केंद्र सरकारने अग्निपथ योजना सुरू केल्यानंतर देशाच्या विविध भागांत निदर्शने सुरू झाली. नंतर या वर्षासाठी भरतीसाठी कमाल वयोमर्यादा ही 23 वर्षे करण्यात आली आहे.

या योजनेला विरोध करताना भगवंत मान यांनी यापूर्वी म्हटले होते की, भाजप सरकारची अग्निपथ योजना अत्यंत अतार्किक पाऊल आहे.. ज्यामुळे भारतीय लष्कराची जडणघडण खराब होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...पुण्यात नेमकं काय घडलं?

Session Court : लैंगिक छळ प्रकरणात माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरण्यास बंदी; न्यायालयाचा आदेश जारी

Rohit Sharma : 6,8,4,11 आणि 4... वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला झालं तरी काय? BCCI अन् चाहते टेन्शनमध्ये

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

मतदान करण्यासाठी गेलेला मतदार जाग्यावरच कोसळला, अन्... महाड तालुक्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT