engineering 
देश

'इंजिनिअरिंग'संदर्भातील निर्णय मागे घेतलेला नाही; अंमलबजावणीचा निर्णय राज्य सरकारचा

संतोष शाळिग्राम

नवी दिल्ली, ता. १६ : बारावीला भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र हा विषय नसेल, तरी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश देण्याच्या मुद्द्यावर अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) ठाम आहे. हा निर्णय मागे घेतलेला नाही. त्याची अंमलबजावणी करायची की नाही, याचा निर्णय राज्य सरकारने घ्यायचा आहे. हा पर्याय देखील आधीच दिलेला आहे, अशी स्पष्टोक्ती परिषदेने 'सकाळ'शी बोलताना केली.

अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत बारावीला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे विषय सक्तीचे होते. परंतु परिषदेने जुन्या नियमांची चौकट मोडत या विषयांव्यतिरिक्त अकरा विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीसाठी पात्र ठरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून परिषदेवर टिकेचा भडिमार होत आहे. या संदर्भात परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे आणि उपाध्यक्ष डॉ. एम. पी. पुनिया यांच्याशी संवाद साधला. गणित वा भौतिकशास्रापासून दूर राहिलेल्या विद्यार्थ्यांना हे विषय पुन्हा शिकण्याची संधी देऊन त्यांच्यापर्यंत अभियांत्रिकी शिक्षण पोचविण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

अभियांत्रिकी क्षेत्र काळानुरूप बदलले असल्याचे सांगताना डॉ. पुनिया म्हणाले, ‘‘आता अभियांत्रिकीच्या 261 शाखा आहेत. अनेक शाखांसाठी रसायनशास्त्र या विषयाची गरजही पडत नाही. म्हणूनच या शाखांच्या प्रवेशासाठी रसायनशास्त्र विषयाची सक्ती करण्याची गरज नाही. त्यामुळे परिषदेने 2010 पासूनच या विषयाला पर्यायी विषय दिले आहेत. आता आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.’’

आम्ही तज्ज्ञांची सल्लासमलत करूनच हा निर्णय घेतलेला आहे. त्याचा अर्थ लोकांना समजलेला नाही. म्हणून त्यावर टीका केली जात आहे. अभियांत्रिकी प्रवेशासाठी या (पीसीएम) तीनही विषयांना वगळण्यात आल्याचा समज झाला आहे. पण नेमका निर्णय लोकांनी समजून घ्यावा. बारावीसाठी आता इलेक्ट्रॉनिक्स, संगणक यांसारखे विषय आहेत. हे विषय भौतिकशास्त्र, गणित वा रसायनशास्त्राला पर्याय म्हणून घेतले असतील आणि याच विषयांमध्ये विद्यार्थ्याला इंजिनियरिंग करायचे असेल, तर त्याला प्रवेश मिळणार आहे. त्यानंतर मात्र या विषयाचे आवश्यक शिक्षण पहिल्यावर्षी विद्यार्थ्याला घ्यावेच लागेल, असे डॉ. पुनिया यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे शिक्षण घेता यावे, हा देखील या निर्णयामागील हेतू आहे. ‘पीसीएम’शिवाय विद्यार्थ्यांने अभियांत्रिकी शाखेला प्रवेश घेतला आणि त्याने अकरावी, बारावीत या तीनपैकी एखाद्या विषयाचे शिक्षण घेतले नसेल, तर त्याला पूरक (ब्रिज) कोर्स देण्याचा पर्याय आहे. आयआयटीसाठी कमी गुण असलेल्या विद्यार्थ्याला तांत्रिक नियमांच्या आधारे प्रवेश मिळाला, तर त्याला प्रथम वर्षाला लगेच प्रवेश दिला जात नाही. त्यासाठी एक वर्ष त्याच्याकडून तयारी (प्रीप्रेटरी कोर्स) करून घेतली जाते. अशा पद्धतीचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध असतील, तर अकरावी, बारावीमध्ये न शिकलेला भौतिकशास्र वा गणित विषय अन्य अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये पहिल्या वर्षी शिकविण्याचा पर्याय दिला, तर त्यात गैर काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

तंत्रशिक्षण पदविका शिक्षणासाठी विद्यार्थी दहावीनंतर प्रवेश घेतो. त्यावेळी त्याचे भौतिकशास्र आणि गणिताचे ज्ञान हे दहावीच्या पातळीचे असते. पुढे तीन वर्षांनी तो थेट अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेतो. या काळात अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षीचे विषय देखील तो शिकत नाही, तरीही तो पदवी मिळवतो. त्यामुळे परिषदेच्या या नव्या निर्णयायामुळे शिक्षणाची गुणवत्ता कमी होईल, ही भीती निराधार आहे, असे डॉ. पुनिया यांनी स्पष्ट केले.

तयारीसाठी विशेष प्रणाली

एखाद्या विद्यार्थ्याने अकरावी, बारावीमध्ये भौतिकशास्र वा गणित याचे शिक्षण घेतले नसेल आणि नव्या पद्धतीनुसार या विद्यार्थ्याने अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला असेल, तर त्याला  स्वयम, नँशनल एज्युकेशन अलायन्स फॉर टेक्नॉलॉजी, स्टुडंट लर्निंग असेसमेंट या प्रणालीच्या माध्यमातून या विषयांचे शिक्षण घेता येईल, असे डॉ. एम. पी. पुनिया यांनी 'सकाळ'ला सांगितले. एआयसीटीईने निर्णय मागे घेतलेला नाही. मात्र हा निर्णय राबविण्याची सक्ती  देखील केलेली नाही. नव्या शैक्षणिक धोरणाला अनुसरून हा निर्णय घेतला आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे अभियंता होण्याचे स्वप्न साकार होणार आहे.

- डॉ. अनिल सहस्रबुद्धे (अध्यक्ष, अखिल भारतीय‌ तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray : एकत्र आले पण एकत्र राहणार का? राज ठाकरेंच्या आदेशामुळे युतीबाबत संभ्रम

Stock Market Opening: शेअर बाजाराची सपाट सुरुवात; सेन्सेक्स 34 अंकांनी घसरला, बाजारात दबाव का दिसून येत आहे?

Tulsi Water Benefits: सकाळी तुळशीचे पाणी प्यायल्याने पावसाळ्यात 'या' 4 आजारांवर होईल मात

मराठमोळ्या गाण्यावर सोनालीचे इंग्लंडमध्ये ठुमके, कवितेवर केला हटके डान्स, व्हिडिओ व्हायरल

दादरची 'ती' ओळख होणार इतिहासजमा! अनेक दशकांपासून अस्तित्वात असलेल्या कबुतरखान्याचा शेवटचा Video व्हायरल, लोक हळहळले

SCROLL FOR NEXT