Amritpal Singh 
देश

Amritpal Singh : तुमच्याकडे ८० हजार पोलिस, तरी अमृतपाल...; उच्च न्यायालयाने पंजाब सरकारला फटकारलं

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - अमृतपाल सिंह यांच्या शोधासाठी अजूनही सर्च ऑपरेशन सुरू आहे. पंजाब पोलीस शनिवारपासून अमृतपालचा शोध घेत आहेत. दरम्यान, हे प्रकरण पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयात पोहोचले आहे. अमृतपाल पळून गेल्याबद्दल पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने पंजाब सरकारला फटकारले आहे.

अमृतपाल सिंग पळून गेल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला फटकारले. आपल्याकडे ८० हजार पोलिस आहेत, तरीही तुम्ही अमृतपालला अटक का करू शकला नाहीत, असा सवाल हरियाणा आणि पंजाब उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने पंजाबचे महाधिवक्ता विनोद घई यांना केला.

पंजाबचे महाधिवक्ता विनोद घई यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात सांगितले की, अमृतपाल सिंग याच्याविरोधात रासुका लावण्यात आला आहे. या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्ती एन.एस. शेखावत यांनी तो कसा पळून गेला, असा सवाल महाधिवक्ता विनोद घई यांना विचारला.

या प्रकरणातील इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. या उत्तरानंतर खंडपीठाने अमृतपाल सिंग वगळता सर्वांना अटक कशी झाली, असा सवाल केला. आपल्याकडे ८० हजार पोलिस आहेत. त्याला अटक कशी झाली नाही? जर तो पळून गेला तर ते गुप्तचर यंत्रणेचे अपयश असल्याचं न्यायालयाने म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TV Advertising Rules: टीव्हीवर आता जास्त जाहिराती दिसणार? केंद्र सरकारने २० वर्षांचा नियम हटवला; दर्शकांवर काय परिणाम होणार?

CM Vijay Trisha Viral News : चेन्नईत काय घडलं? थलपती विजय यांना पाहताच अभिनेत्री त्रिशानं मारला कडक सॅल्यूट; तिच्या पिवळ्या साडीतील लूकनंही वेधलं लक्ष

तब्बल १० वर्ष सोनाली कुलकर्णीसोबत बोलत नव्हता सिद्धार्थ जाधव; कारण सांगत अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा श्रीदेवींचं निधन झालं...'

Marathi News Live Updates : सर्वांमध्ये एकता, देशाबद्दल प्रेम आणि सद्भावना असायला हवी - रितू तावडे

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला निघालेल्या मुली, ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्यानं ३ मैत्रिणींचा मृत्यू

SCROLL FOR NEXT