Amritpal Singh 
देश

Amritpal Singh : तुमच्याकडे ८० हजार पोलिस, तरी अमृतपाल...; उच्च न्यायालयाने पंजाब सरकारला फटकारलं

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - अमृतपाल सिंह यांच्या शोधासाठी अजूनही सर्च ऑपरेशन सुरू आहे. पंजाब पोलीस शनिवारपासून अमृतपालचा शोध घेत आहेत. दरम्यान, हे प्रकरण पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयात पोहोचले आहे. अमृतपाल पळून गेल्याबद्दल पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने पंजाब सरकारला फटकारले आहे.

अमृतपाल सिंग पळून गेल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला फटकारले. आपल्याकडे ८० हजार पोलिस आहेत, तरीही तुम्ही अमृतपालला अटक का करू शकला नाहीत, असा सवाल हरियाणा आणि पंजाब उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने पंजाबचे महाधिवक्ता विनोद घई यांना केला.

पंजाबचे महाधिवक्ता विनोद घई यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात सांगितले की, अमृतपाल सिंग याच्याविरोधात रासुका लावण्यात आला आहे. या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्ती एन.एस. शेखावत यांनी तो कसा पळून गेला, असा सवाल महाधिवक्ता विनोद घई यांना विचारला.

या प्रकरणातील इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. या उत्तरानंतर खंडपीठाने अमृतपाल सिंग वगळता सर्वांना अटक कशी झाली, असा सवाल केला. आपल्याकडे ८० हजार पोलिस आहेत. त्याला अटक कशी झाली नाही? जर तो पळून गेला तर ते गुप्तचर यंत्रणेचे अपयश असल्याचं न्यायालयाने म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT