APJ Abdul Kalam esakal
देश

APJ Abdul Kalam: 'मिसाईलमॅन' डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे 10 प्रेरणादायी विचार

डॉ एपीजे अब्दुल कलाम यांची सातवी पुण्यतिथी

सकाळ डिजिटल टीम

महान विचारवंत, लेखक आणि शास्त्रज्ञ तसेच भारताचे 11 वे राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांची आज सातवी पुण्यतिथी आहे. आज जरी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आपल्या सर्वांमध्ये नसले तरी त्यांचे आदर्श जीवन प्रत्येक देशवासीयाला जीवनात पुढे जात राहण्याची आणि यशाच्या पायऱ्यांवर चालत राहण्याची प्रेरणा देते. (APJ Abdul Kalam Death Anniversary)

एयरोस्पेस शास्त्रज्ञ असण्याव्यतिरिक्त, डॉ एपीजे अब्दुल कलाम यांनी 2002 ते 2007 पर्यंत भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणून काम केले. त्यांनी देशाच्या संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) सोबतही त्यांनी काम केले आहे. भारतातील डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना 'मिसाइल मॅन' या नावानेही ओळखतात.

डॉ एपीजे अब्दुल कलाम यांनी भारताला जागतिक महासत्ता बनवण्याच्या सर्वात महत्त्वाच्या अणुचाचण्यांपैकी एक असलेल्या पोखरण-2 मध्ये मध्यवर्ती भूमिका बजावली होती. यासोबतच त्यांनी संरक्षण क्षेत्राला पुढे नेत भारतीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आणि प्रक्षेपण वाहन तंत्रज्ञान विकसित केले. त्यांचे 'विंग्ज ऑफ फायर' हे पुस्तक आजही अनेक तरुणांना आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देत आहे.

डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी रामेश्वरम येथे झाला. 27 जुलै 2015 रोजी IIM शिलाँग येथे व्याख्यान देताना हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 83 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांचे पूर्ण नाव डॉक्टर अबुल पाकिर जैनुल्लाब्दीन अब्दुल कलाम होते.

डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचे 10 प्रेरणादायी विचार

1) "स्वप्न ती नसतात जी आपण झोपेत पाहतो, स्वप्ने ती असतात जी आपल्याला झोपू देत नाहीत."

2) "आयुष्यात कोणत्याही कारणास्तव हार मानू नका आणि समस्या कधीही आपला पराभव करू शकत नाहीत."

3) "या जगात एखाद्याला पराभूत करणे खूप सोपे आहे, परंतु एखाद्याला जिंकणे तितकेच कठीण आहे."

4) "पहिल्यांदा जिंकल्यावर आपण आराम करू नये. जर आपण दुसऱ्यांदा हरलो तर लोक म्हणतील की पहिला विजय आपल्याला मिळाला तो फुकाचा होता."

5) "तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर आधी सूर्यासारखे जळा."

6) "विज्ञान ही मानवतेला मिळालेली एक सुंदर देणगी आहे, ती आपण खराब करू नका."

7) "तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे जाणून घ्या. जगातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपण कुठे उभे आहोत, आपण कोणत्या दिशेने जात आहोत हे समजणं."

8) "जेव्हा आशा, स्वप्ने आणि ध्येये तुटून पडतील, तेव्हा या निराशेच्या ढिगाऱ्यांमध्ये तुम्हाला लपलेली सुवर्ण संधी सापडेल."

9) "देशातील सर्वोत्कृष्ट बुद्धिमान वर्गाच्या शेवटच्या बेंचवर आढळू शकते."

10) "जर तुम्हाला काळाच्या वाळूवर तुमच्या पावलांचे ठसे सोडायचे असतील तर पाय ओढू नका."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : मोठी बातमी! तेजस्वी यादव यांच्याविरोधात गडचिरोलीत गुन्हा दाखल

TikTok India News: भारतात पुन्हा 'टिकटॉक' सुरू होणार? ; वेबसाइट सुरू झाल्याचे समोर आल्याने चर्चांना उधाण!

Ajit Pawar: 'चाकरमानी’ नव्हे; ‘कोकणवासीय’ म्हणायचे! अजित पवारांची जागवला स्वाभिमान; शासन लवकरच परिपत्रक काढणार

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीचं पुनर्गठन; राधाकृष्ण विखेंकडे अध्यक्षपद

Georai News : पाझर तलावात उतरल्याने बुडून शेतमजूराचा मृत्यू; दिवसभर शोध घेऊनही मृतदेह मिळाला नाही

SCROLL FOR NEXT