नरेंद्र मोदी 
देश

नियम बदला पण यानांच भारतरत्न द्या!, PM मोदींकडे मागणी

नामदेव कुंभार

मागील दोन वर्षांपासून भारतासह जगावर कोरोना महामारीचं संकट आहे. या महामारीमध्ये डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी रुग्णांसाठी देव ठरत आहेत. आपल्या जिवाची बाजी लावून दिवसरात्र आपलं कर्तव्य बजावत आहेत. अशाच डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एक खास मागणी केली आहे. कोरोना काळात आपली सेवा देणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना यंदाचा भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी केजरीवाल यांनी केली आहे. यासाठी हवे तर नियमात बदल करा... अशी सुचनाही केजरीवाल यांनी दिली आहे.

कोरोना महामारीमध्ये आपलं कर्तव्य बजावत असताना अनेक डॉक्टरांचा प्राणही गेले आहेत. अशा डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान व्हायला हवा, अशी भूमिका केजरीवाल यांनी घेतली आहे. केजरीवाल यांनी ट्विट करत म्हटलेय की, 'यंदा भारतीय डॉक्टरांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात यायला हवं. भारतीय डॉक्टर म्हणजेच, सर्व डॉक्टर, नर्स आणि पॅरामेडिकल स्टाप होय. कोरोना काळात मृत्यू पावलेल्या डॉक्टरांना ही खरी श्रद्धांजली असेल, असेही केजरीवाल यांनी म्हटलेय. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना भारतरत्न दिल्यास संपूर्ण देश खूश होईल.'

जर नियमांनुसार, एखाद्या समुहाला भारतरत्न देता येत नसेल, तर नियमांत बदल करा. आज संपूर्ण देश डॉक्टारांचा आभारी आहे. जर डॉक्टरांना भारतरत्न दिला, तर संपूर्ण देशाला आनंद होईल, असं केजरीवाल यांनी पत्रात म्हटलेय.

देशात गेल्या दीड वर्षात कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या जवळपास बाराशे डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यात राज्यातील ७०; तर मुंबईतील २५ डॉक्टरांचा समावेश आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Election 2025 : बिहारमध्ये मोठी घडामोड! स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता 'या' पक्षाने अचानक निवडणुकीतूनच घेतली माघार

Uttar Pradesh : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत केले दीपोत्सवाचे उद्घाटन, राम मंदिराच्या भूमिकेवरून विरोधकांवर साधला निशाणा

R Ashwin: 'भारतीय क्रिकेटमध्ये सर्वकाही अप्रत्यक्षपणे घडतंय...' शमी-आगरकर वादानंतर अश्विनला नेमकं काय म्हणायचंय?

Crime News : दोन मुलांच्या आईचा तरुणावर जडला जीव, नकार मिळताच उचललं धक्कादायक पाऊल, नेमकं काय घडलं? वाचा...

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये खाजगी बसचा अपघात, ८ जण जखमी

SCROLL FOR NEXT