ARVIND KEJARIWAL sakal
देश

AAP ची विचारसरणी आहे तरी काय? केजरीवालांनी सांगितले 'हे' चार स्तंभ

आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांची पक्षाच्या विचारसरणीबद्दल स्पष्टोक्ती.

सुधीर काकडे

दिल्ली : अण्णा हजारे यांनी जनलोकपाल बील लागू करावं ही मागणी घेऊन दिल्लीत मोठं आंदोलन छेडलं होतं. याच आंदोलनात अण्णा हजारे यांच्यासोबत एक चेहरा दिसत होता, तो चेहरा म्हणजे अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal). पुढे अरविंद केजरीवाल यांनी राजकारणात येत आम आदमी पक्षाची (AAP) स्थापना केली आणि पाहता पाहता थेट देशाची राजधानी दिल्लीवर सत्ता स्थापन केली. त्यानंतर आता पंजाबमध्ये (Punjab) आम आदमी पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला. त्यातच आता अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाच्या विचारधारेवरून केलेलं एक ट्विट चर्चेत आलं आहे.

देशात सर्वात मोठे पक्ष असलेल्या भाजप आणि काँग्रेसला तिसरा पर्याय हा आम आदमी पक्ष असल्याचं राजकीय विश्लेशकांकडून बोललं जातंय. भाजपची उजवी विचारसरणी आणि काँग्रेसची सेक्युलर भूमिका वगळता अनेकांना तिसरा पर्याय हवाआहे, तो पर्याय म्हणून आता आम आदमी पक्ष लोकांसमोर येण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. त्यातच आम आदमी पक्षाने आता आपली विचारसरणी काय? याचं उत्तर दिलं आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी नुकतंच एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी आम आदमी पक्षाची विचारधारा सांगितली आहे. ते म्हणाले, आम आदमी पक्षाच्या विचारधारेटे तीन स्तंभ आहेत. त्यातला पहिला स्तंभ म्हणजे देशप्रेम, दुसरा स्तंक्ष कट्टर ईमानदारी आणि चौथा स्तंभ हा माणुसकी असल्याचं ते म्हणाले आहेत. तसंच पुढे त्यांनी, "दिल दिया है, जाँ भी, ए वतन तेरे लिये" या ओळी देखील लिहील्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VHT 2025-26: पडिक्कलने कोणालाच न जमलेला विक्रम केला, निवड समितीच्या नाकावर टिच्चून केली दमदार खेळी; मुंबईला फेकले स्पर्धेबाहेर

BJP Mumbai : मुंबईचा भूमीपुत्र, ‘मराठी माणूस’ मुंबईतच राहणार!',भाजपचा यशस्वी 'मास्टरप्लॅन'

Crime News : मुलाच्या निधनानंतर पैशाची हाव; सासऱ्याचं सुनेसोबत भलतंच कृत्य, महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?

Pune Crime : "पोलिसांत गेला तर जीपला बांधून वरात काढीन"; सावकाराची धमकी, लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल.

Election News: महानगरपालिका निवडणुकीआधी मतदान केंद्रांत बदल; केंद्रे स्थलांतरित, कुठे आणि का? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT