Arvind Kejariwal
Arvind Kejariwal 
देश

दिल्ली दंगलीत झालेली भावाची हत्या; 'आप' सरकारनं दिली सरकारी नोकरी

सकाळ डिजिटल टीम

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या वर्षी अंकित शर्मा यांच्या कुटुंबाला १ कोटी रुपयांचा धनादेश मदत निधी म्हणून दिला होता.

दिल्लीत २०२० मध्ये झालेल्या दंगलीत अनेकांचे प्राण गेले होते. यात इंटेलिजन्स ब्युरोचे कर्मचारी अंकित शर्मा यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. आता दिल्ली सरकारने त्यांचे भाऊ अंकुर शर्मा यांना शिक्षण विभागात नोकरी दिली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज त्यांच्या कुटुंबियांकडे सरकारी नोकरीचे पत्र सोपवले.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या वर्षी अंकित शर्मा यांच्या कुटुंबाला १ कोटी रुपयांचा धनादेश मदत निधी म्हणून दिला होता. दिल्ली सरकारने आता अंकित शर्मा यांचा भाऊ अंकुर शर्मा यांना शिक्षण विभागात नोकरी दिली आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं की, माणसाची जागा भरून काढता येणार नाही, मात्र सरकारी नोकरी आणि मदत निधीने कुटुंबाला बळ मिळेल.

राजधानी दिल्लीत फेब्रुवारी २०२० मध्ये दंगल उसळली होती. या दंगलीवेळी अंकित शर्मा यांची हत्या करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात त्यांच्या निर्घृण हत्येबद्दल सांगण्यात आलं होतं. या प्रकरणी आम आदमी पार्टीच्या ताहीर हुसैन यांच्यासह १० लोकांना अटकसुद्धा करण्यात आली होती. दिल्लीत झालेल्या या दंगलीत जवळपास ५३ जणांचा मृत्यू झाला होता तर ४०० हून अधिक लोक जखमी झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरू चेन्नई प्लेऑफच्या एका जागेसाठी भिडणार, पण पावसाचे अंदाज काय?

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींनी रायबरेली, अमेठीत प्रचार करणे टाळले, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT