Arvind Kejriwal News esakal
देश

काश्मीरमध्ये जे घडतयं त्याने भारतीयांच्या मनात राग अन् चिंता : केजरीवाल

'आज पुन्हा काश्मिरी पंडित आपली जन्मभूमी सोडण्यासाठी तयार झाले आहेत.'

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली : काश्मीरमध्ये जे काही घडत आहे, त्याने प्रत्येक भारतीयांच्या मनात राग आणि चिंता आहे, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले. काश्मीरमध्ये सुरु असलेल्या हत्यासत्रांविरोधात आम आदमी पक्षाच्या वतीने दिल्लीत (Delhi) आज रविवारी (ता.पाच) निदर्शने करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. पुढे केजरीवाल म्हणाले, काश्मिरी पंडितांची निवडून हत्या केली जात आहे. (Arvind Kejriwal Says, What Happens In Kashmir Is Disturbing For Every Indians)

आज पुन्हा काश्मिरी पंडित (Kashmiri Pandit) आपली जन्मभूमी सोडण्यासाठी नाईलाजास्तव तयार झाले आहेत. मला समजले आहे, की पंतप्रधान मदत योजनेअंतर्गत ४ हजार ५०० काश्मीर पंडितांना काश्मीरमध्ये वसवण्यात आले. त्यांना नोकरी दिली गेली. काश्मिरमध्येच काम करावे लागले असे त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आले. आज काश्मिरी पंडित हे प्रतिज्ञापत्र रद्द करण्याची मागणी करित असल्याचे अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले.

आज आम्ही चार मागणी करत आहोत. एक- भाजपच्या केंद्र सरकार देशा समोर काश्मिरी पंडित, हिंदु आणि लष्कराच्या सुरक्षेचा प्लॅन ठेवावे. दोन - हे प्रतिज्ञपत्र रद्द करा. तीन - काश्मिरी पंडितांची प्रत्येक मागणी पूर्ण केली जावी. चार - त्यांना सुरक्षा दिली जावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirav Modi: नीरव मोदीसह इतरांवरील भ्रष्टाचाराचे आरोप रद्द, CBI न्यायालयाचा मोठा निर्णय

मी सेटवरून रडत घरी आलेले... निवेदिता सराफ यांनी सांगितला हिंदी मालिकेचा कटू अनुभव; म्हणाल्या, 'माझ्या आईने मला...'

Monsoon 2026: राज्यासाठी धोक्याची घंटा, यंदा पाऊस कमी होणार.. चिंता वाढली..

Latest Marathi News Live Update : ठाणेकरांवर पाणीसंकट गडद, धरणाच्या पाणीपातळीत घट

Pachod Water Issue : पाणीपुरवठा योजनांचा केवळ फार्स ..! तीन योजना राबवूनही थेरगाव येथे तहान भागविण्यासाठी जिवघेणी कसरत

SCROLL FOR NEXT