Atal ji has to be compared to Nehru and Indira gandhi only says Madhav Bhandari 
देश

अटलजींची तुलना केवळ नेहरू व इंदिरांजीशीच करावी लागेल- माधव भंडारी

ब्रह्मा चट्टे

मुंबई : अटलजींनी देशाच्या विकासाचा मार्गच बदलून टाकला. अटलजींची तुलना करायची झालीच तर नेहरू व इंदिरा गांधींशीच करावी लागेल, इतके अफाट काम अटलजींनी केल्याचे भाजप प्रवक्ता माधव भंडारी यांनी सांगितले. 

मुंबई येथे काल (ता.19) भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना शब्दसुमनांजली वाहण्यात आली. महाराष्ट्र एकता अभियान आणि राजहंस प्रकाशन यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात भंडारी बोलत होते. यावेळी, आमदार अशिष शेलार, पोखरण चाचणीत महत्वाची भूमिका बजावणारे सुरेश हावरे, लेखक सारंग दर्शने, भाजप नेते मधु चव्हाण, ऑर्कीडचे विठ्ठल कामत उपस्थित होते.

माधव भंडारी म्हणाले की, "अटलजींचा सहवास ज्यांना लाभले ते भाग्यवान आहेत. देशातील सगळ्या महानगरांना रस्त्यांनी जोडल्यामुळे देशातील गाव महानगरांना जोडली गेली. यामुळे, देशाचा वेगवान विकास झाला. जगभरात विखूरलेल्या भारतीयांना एकजूट करण्याचे काम अटलजींनी केले. त्यांच्यामुळे अनिवाशी भारतीयांनी भारतात गुंतवणूक केली. अटलजींचे देशाच्या विकासातील योगदानाविषयी चर्चा करायची झाली. तुलना करायची झालीच तर ती केवळ नेहरू व इंदिरा गांधींशीच करावी लागणार आहे. अटलजींनी देशाच्या अण्विक विकासामध्ये मोलाचे योगदान दिल्यानेच अमेरिकेसारख्या देशाला भारताबरोबर अणू करार करावा लागल्याचे भंडारी यांनी नमूद केले." 

यावेळी आमदार मधू चव्हाण म्हणाले की, " पुराणकाळात श्रीकृष्णाला पुर्णपुरूष म्हणटले जायचे. छत्रपती शिवरायांना पुर्णपुरूष म्हणटले जायचे. त्यानंतर अटलजींना पुर्ण पुरूष म्हणावं लागले. 1 मताने सरकार पडले पण अटलजींनी मुल्यांना सोडले नाही. मत विकत घेणे शक्य होते पण अटलजींने ते केले नाही." 

राजहंस प्रकाशनातर्फे सारंग दर्शने यांनी लिहिलेल्या "अटलजी" या पुस्तकाचे काही महिन्यांपूर्वी प्रकाशन झाले होते. या पुस्तकासंबंधी अटलजींवर परिसंवादाचा कार्यक्रम आयोजलेला होता. मात्र, 16 ऑगस्ट रोजी अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर हा कार्यक्रम शब्दसुमनांजलीत परावर्तीत करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनुष्का शर्माकडे टीम इंडियाचे कर्णधारपद! इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला 'अ' संघाची घोषणा; पाहा कोणा कोणाला मिळाली संधी

मिसिंग लिंक बनला टुरिस्ट स्पॉट! फोटो काढण्यासाठी गाड्यांच्या लांबच लांब रांगा, व्हिडिओ व्हायरल; MSRDC चा प्रवाशांना इशारा

Beed Crime : पुण्यानंतर बीडमध्येही संतापजनक घटना ! आजोळी आलेल्या ३.५ वर्षांच्या नातीवर आजोबाचा लैंगिक अत्याचार

HSC Result: मुंबईतील १० शाळांचा निकाल शून्य टक्के, सर्व विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत नापास

Satara Crime: साताऱ्यात धक्कादायक प्रकार उघड; कॅफेमध्ये अल्पवयीनांसाठी ‘खास रूम’चा पर्दाफाश, कॅफे आडून गैरप्रकार!

SCROLL FOR NEXT