Nitish Kumar vs Prashant Kishor esakal
देश

Bihar Politics : नितीश कुमार पंतप्रधान होण्याच्या शक्यतांबाबत काय म्हणाले प्रशांत किशोर?

'नितीश भाजपसोबत गेल्यापासून अस्वस्थ होते.'

सकाळ डिजिटल टीम

'नितीश भाजपसोबत गेल्यापासून अस्वस्थ होते.'

Bihar Politics : नितीश कुमार (Nitish Kumar) आज पुन्हा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. नितीश कुमार यांच्यासोबत तेजस्वी यादवही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी नितीश कुमार यांच्या भूमिकेवर महत्त्वपूर्ण भाष्य केलंय.

प्रशांत किशोर म्हणाले, नितीश कुमार यांनी 10 वर्षात हा सहावा प्रयोग केलाय. त्यामुळं त्यांच्या राजकीय स्थितीवरही परिणाम होईल, असं ते म्हणाले. नितीश कुमारांच्या विश्वासार्हतेवर कोणता परिणाम होईल की नाही, हे जनताच ठरवणार आहे. 115 आमदार असलेल्या पक्षाची संख्या आता 43 वर आलीय. त्यामुळं त्यांच्या विश्वासार्हतेचा अंदाज आपल्याला आला असेल. युती करून ते कसे तरी मुख्यमंत्री होतात ही वेगळी बाब आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

'आज तक' वाहिनीशी केलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी बिहारमधील राजकीय परिस्थितीबद्दल भाष्य केलं. '2012-13 पासून राज्यात राजकीय अस्थिरतेचा काळ आहे. याचाच हा एक अध्याय आहे. गेल्या 10 वर्षातील हे सहावं सरकार आहे. 2017 मध्ये नितीश एनडीएमध्ये जाण्याची चूक काय होती? या प्रश्नावर पीके म्हणाले, वेळच सांगेल. नितीशकुमार मुख्यमंत्री होत असताना हे सहावं सरकार आहे. खेदाची बाब म्हणजे, या बदलांमुळंही मुख्यमंत्री नितीशच राहिलेत आणि काम करण्याच्या पद्धतीत कोणताही बदल झालेला नाहीय.'

दारूबंदीबाबत काय निर्णय होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार असल्याचं निवडणूक रणनीतीकारानं सांगितलं. दारूबंदीला राजदनं विरोध केलाय. तेजस्वी यादव यांनी 10 लाख नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलंय. आता ते कसं होतं हे पहावं लागेल. या गोष्टी पूर्ण झाल्या तर आनंद आहे आणि तरुणांचंही भलं होईल. नितीश पंतप्रधान होण्याच्या शक्यतांबाबत ते म्हणाले, नितीश कुमार हे तसे व्यक्ती नाहीत, असं त्यांनी स्पष्टच सांगितलं. नितीश भाजपसोबत गेल्यापासून अस्वस्थ होते. त्यामुळं त्यांनी भाजपसोबतची युती तोडली असावी. बिहारबाहेर त्यांच्या वाटचालीचा फारसा परिणाम दिसत नाही. 2015 च्या महागठबंधनात आणि आताच्या महागठबंधनात फरक आहे. मला वाटत नाही की, ते कोणत्याही राष्ट्रीय रणनीतीवर काम करत आहेत, त्याचं केंद्र बिहार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT