Bilkis Bano Case
Bilkis Bano Case Sakal
देश

Bilkis Bano Case: आरोपींच्या सुटकेनंतर भीतीने मुस्लिमांनी गाव सोडलं; म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

बिल्किस बानो प्रकरणातील ११ आरोपींना गुजरात सरकारने माफी धोरणांतर्गत मुक्त केलं. त्यावरुन सध्या देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, रंधिकपूर गावातील मुस्लिमांनी आपला जीव वाचवण्यासाठी आपलं गाव सोडलं आहे. तसंच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहित पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. (Bilkis Bano Case)

बिल्किस बानो प्रकरणातल्या ११ आरोपींच्या मुक्ततेनंतर रंधिकपूर गावातले मुस्लीम नागरिक गाव सोडून देवगड बारिया इथल्या रहिमाबाद कॉलनीमध्ये स्थलांतरित झाले. रहिमाबाद कॉलनी जमियतने २००२ च्या गुजरात दंगलीतील पीडितांसाठी बांधली होती. स्थलांतरीतांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात या ११ आरोपींना पुन्हा तुरुंगात टाकण्याची मागणी करण्यात आली. तसंच या स्थलांतरितांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. त्यानंतर आपण गावी परतू, असंही या नागरिकांनी सांगितलं आहे.

दहोडच्या जिल्हाधिकाऱ्यांना इथल्या ग्रामस्थांनी पत्र दिलं आहे. या पत्रावर ५५ नागरिकांनी सह्या केल्या आहेत. जोवर या ११ आरोपींना पुन्हा तुरुंगात टाकलं जाणार नाही, तोवर आपण गावात परत येणार नाही, असं या नागरिकांनी सांगितलं आहे. बिल्किस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार आणि त्यांच्या घरच्यांची गुजरात दंगलीच्या वेळी २००२ साली हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून बिल्किस बानो या कायदेशीर लढाई लढत होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : ममता बॅनर्जी यांचा जाहीर सभेत कलाकारांसोबत डान्स

Electric Scooters Battery: इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी खराब झाल्यास मिळतात 'हे' संकेत, वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT