Bilkis Bano Case Sakal
देश

Bilkis Bano Case: आरोपींच्या सुटकेनंतर भीतीने मुस्लिमांनी गाव सोडलं; म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

बिल्किस बानो प्रकरणातील ११ आरोपींना गुजरात सरकारने माफी धोरणांतर्गत मुक्त केलं. त्यावरुन सध्या देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, रंधिकपूर गावातील मुस्लिमांनी आपला जीव वाचवण्यासाठी आपलं गाव सोडलं आहे. तसंच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहित पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. (Bilkis Bano Case)

बिल्किस बानो प्रकरणातल्या ११ आरोपींच्या मुक्ततेनंतर रंधिकपूर गावातले मुस्लीम नागरिक गाव सोडून देवगड बारिया इथल्या रहिमाबाद कॉलनीमध्ये स्थलांतरित झाले. रहिमाबाद कॉलनी जमियतने २००२ च्या गुजरात दंगलीतील पीडितांसाठी बांधली होती. स्थलांतरीतांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात या ११ आरोपींना पुन्हा तुरुंगात टाकण्याची मागणी करण्यात आली. तसंच या स्थलांतरितांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. त्यानंतर आपण गावी परतू, असंही या नागरिकांनी सांगितलं आहे.

दहोडच्या जिल्हाधिकाऱ्यांना इथल्या ग्रामस्थांनी पत्र दिलं आहे. या पत्रावर ५५ नागरिकांनी सह्या केल्या आहेत. जोवर या ११ आरोपींना पुन्हा तुरुंगात टाकलं जाणार नाही, तोवर आपण गावात परत येणार नाही, असं या नागरिकांनी सांगितलं आहे. बिल्किस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार आणि त्यांच्या घरच्यांची गुजरात दंगलीच्या वेळी २००२ साली हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून बिल्किस बानो या कायदेशीर लढाई लढत होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT