bill gates.jpg 
देश

कोरोनावरील संशोधन आणि उत्पादनात भारताची कामगिरी प्रेरणादायी- बिल गेट्स

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली- प्रख्यात उद्योगपती आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी पुन्हा एकदा कोरोना विषाणूविरोधातील लढाईसाठी भारताच्या योगदानाचे कौतुक केले आहे. भारताचे संशोधन आणि उत्पादनाची क्षमता कोरोनाविरोधातील लढाईसाठी खूप महत्त्वाची आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ग्रँड चॅलेंजस एन्युएल मीटिंग 2020 कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान, बिल गेट्स यांनी पंतप्रधान मोदी यांचे टि्वट रिट्विट करत या कार्यक्रमात आपल्याला सहभागी करुन घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले. 

यापूर्वीही अनेकवेळा बिल गेट्स यांनी कोरोना विरोधातील लढाईसाठी भारताची भूमिका महत्त्वाची असल्याचे म्हटले होते. जगातील सर्वात मोठ्या वैद्यकीय उत्पादकांच्या देशात भारताचाही समावेश आहे. त्याचबरोबर लस निर्मितीची सर्वाधिक क्षमता ही भारताची आहे. 

त्यामुळेच सध्या भारतात देशी कोविड लस व्यतिरिक्त ऑक्सफर्डमधील लस आणि रशियातही लशीची चाचणी सुरु आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर भारतात त्याचे उत्पादन वाढवता येईल आणि संपूर्ण देशात त्याचा पुरवठा केला जाऊ शकतो. 

गेट्स यांनी म्हटले की, आता कोविड-19 चा सामना करण्यासाठी विशेषतः मोठ्याप्रमाणावर लस निर्मिती करण्यात भारताची संशोधन आणि उत्पादनात महत्त्वाची भूमिका असेल. हा विषाणू शोधण्यासाठी नाविन्यतेवर भर देण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले. 

दरम्यान, सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रँड चॅलेंजस एन्युएल मीटिंग 2020 मध्ये बोलताना जगातील अनेक क्षेत्रात होत असलेल्या संशोधनात भारताच्या भूमिकेबाबत भाष्य केले होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Latest Maharashtra News Updates : बंगळूर ते पुणे विमान मुंबईच्या दिशेने वळवले

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT