कर्नाटक येथील काँग्रेसचे नेते जमीर अहमद (Jamir Ahmad) यांनी दावा केला होता की भारतामध्ये बलात्कारचे प्रमाण जगभरात सर्वात जास्त आहे, याचे एकमेव कारण म्हणजे इथे मुस्लीम महिला हिजाब घालत नाही. त्यांच्या या विधानावर एकच खळबळ उडाली आणि अनेकांनी त्यांच्या या विधानावर रोष व्यक्त केला. यावर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी (Pralhad Joshi) यांनी प्रतिक्रीया दिली.
प्रल्हाद जोशी म्हणाले, “पाकिस्तान मध्ये काय होत आहे, त्यांना माहिती नाही का? हे सर्व चीप पब्लिसिटीसाठी अशी प्रतिक्रीया देतात. जगात भारताचे नाव खराब करणे, त्यांचे उद्दीष्टे आहे.”
कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या हिजाब वादावर काँग्रेसचे नेते जमीर अहमद यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी दावा केला की,भारतात सर्वाधिक बलात्काराच्या घटना नोंदवल्या जातात कारण महिला बुरखा परीधान करत नाहीत किंवा चेहरा झाकत नाहीत. ते म्हणाले, “मुली मोठ्या झाल्यावर, त्यांचे सौंदर्य लपवण्यासाठी बुरखा ही हिजाब (Hijab) मागची संकल्पना आहे. मला वाटतं जगात सर्वाधिक बलात्काराच्या घटना भारतात होतात कारण इथे स्त्रिया बुरखा परीधान करत नाहीत.”
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.