Modi1 
देश

PM Modi : "भाजपच्या प्रयत्नांमुळं भारतात गरीबी कमी होतेय"; PM मोदींनी दिला तज्ज्ञांचा हवाला

गुजरातमधील विजयासाठी पंतप्रधान मोदींनी भाजपच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भाजपनं गेल्या आठ वर्षात देशात अनेक बदल घडवून आणले असून देशातील गरीबीही कमी झाली आहे. तज्ज्ञांच्या हवाल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. (BJP efforts are reducing poverty in India PM Modi cited experts)

गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज हाती आला. यात हिमाचलमध्ये पराभव झाला असला तरी गुजरातमध्ये भाजपनं रेकॉर्डब्रेक कामगिरी केली. यापार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

यावेळी मोदी म्हणाले, कोणत्या समुदयाकडं किती मत आहेत यावर आम्ही राजकारण आणि देशही चालवत नाही. आमच्या या बदलत्या राजकारणाकडं तज्ज्ञही पाहत आहेत. भारतात गरीबी कमी होत आहे. देशात गेल्या आठ वर्षात गरीबांना सुविधा देण्याबरोबर आधुनिक पायाभूत सुविधाही पुरवल्या आहेत.

शॉर्टकटचं राजकारणाला भारतीय मतदारांना नकोय

आमच्या प्रत्येक घोषणेमागे एक दूरगामी विचार असतो. देशाला आज शॉर्टकट नकोय, देशाचा प्रत्येक मतदाराला माहिती आहे की, आपल्यासाठी काय गरजेचं आहे. शॉर्टकटच्या राजकारणाचा किती मोठा परिणाम त्यांना भोगावे लागेल हे त्यांना माहिती आहे.

गाव-शहर, गरीब-श्रीमंत सर्वांची पहिली आवड भाजप

भारत प्रथम या भावनेनं आपल्याला पुढे जायचं आहे. आज देशात गाव किंवा शहर, गरीब किंवा श्रीमंत सर्वांची पहिली आवड भाजप आहे. भाजपला गुजरातच्या आदिवासींचाही मोठा आशीर्वाद मिळाला आहे. गुजरातमध्ये ४० आरक्षित जागांपैकी २४ जागा भाजपनं जिंकल्या आहेत. आज आदिवासी भाजपला आपला आवाज मानत आहेत. भाजपला मोठा प्रतिसाद मिळतोय. हा बदल संपूर्ण देशाला जाणवतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताने Asia Cup जिंकल्यानंतर पाकिस्तानमध्ये अफगाणी विद्यार्थ्याने दिल्या 'जय हिंद'च्या घोषणा! Video Viral

JNU Ravan Dahan controversy : उमर खालिद अन् शरजीलचे फोटो पुतळ्यावर लावून 'जेएनयू'मध्ये झाले रावणाचे दहन!

Uddhav Thackeray: राज ठाकरेंसोबत युती आहे की नाही? दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी थेट उत्तर देत विषयच संपवला, म्हणाले...

World Cup 2025: पाकिस्तानची पहिल्याच सामन्यात दयनीय अवस्था! आधी १२९ वर ऑलआऊट केलं अन् मग बांगालादेशनं गोलंदाजांनाही झोडलं

Talegaon Dhamdhere News : आठवीत शिकणाऱ्या शेतमजुराच्या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT