kailash vijayvargiya
kailash vijayvargiya file photo
देश

भाजप कार्यालयात सुरक्षेसाठी अग्निविरांना प्राधान्य - विजयवर्गीय

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : अग्निपथ योजनेवरून देशभरात अनेक ठिकाणी निदर्शने सुरू आहेत. या भाजपचे नेते सातत्याने अग्निपथ योजनेचे फायदे तरूणांना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. या दरम्यान इंदौरमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांच्या एका वक्तव्यावरून नवा वाद सुरू झाला आहे. भाजप कार्यालयात सुरक्षा रक्षक ठेवताना अग्निवीरांना प्राधान्य देईल, असे कैलाश विजयवर्गीय यांनी म्हटले आहे. (BJP kailash vijayvargiya said if security guard is needed in bjp office then will be given job to agniveer)

कैलास विजयवर्गीय यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काँग्रेससह देशातील अनेक राजकीय पक्षांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून देशातील तरुण आणि लष्कराच्या जवानांचा एवढा अनादर करू नका, असे म्हटले आहे. आपल्या देशातील तरुण रात्रंदिवस परिश्रम करून शारीरिक परीक्षा उत्तीर्ण होतात कारण त्यांना सैन्यात भरती होऊन आयुष्यभर देशसेवा करायची आहे, भाजप कार्यालयाबाहेर गार्ड व्हायचे आहे म्हणून नाही, असे ते म्हणाले आहेत.

बिहार आणि यूपीनंतर आता मध्यप्रदेशातही अग्निपथ योजनेवरून गोंधळ सुरू आहे. इंदौरमध्ये लष्कराच्या उमेदवार दोन दिवसांपासून सतत निदर्शने करत आहेत. रविवारी कैलाश विजयवर्गीय मीडियाशी संवाद साधण्यासाठी इंदौरमधील भाजप कार्यालयात पोहोचले. याबाबत कैलाश विजयवर्गीय यांना विचारले असता त्यांनी सर्वप्रथम अग्निपथ योजनेचे फायदे सांगितले. त्यानंतर अग्निवीर म्हणून काम केल्यानंतर बाहेर पडल्यावर १३ लाख रुपये मिळतील, असे त्यांनी सांगितले. तसेच त्याच्यावर अग्निवीरचा शिक्काही लागलेला असेल. भाजप कार्यालयात सुरक्षा गार्डची नेमणूक करण्यासाठी देखील अग्निवीरांना प्राधान्य देऊ, असे कैलाश विजयवर्गीय यांनी सांगितले.

ते म्हणाले की, अमेरिका, चीन आणि फ्रान्समध्ये कंत्राटी पद्धतीने सैन्य भरती केली जाते. आपल्याकडे सैन्यातून निवृत्तीचे वय जास्त आहे. ती कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ते म्हणाले की, जेव्हा अग्निवीर ही पदवी घेऊन ते सैन्यातून निवृत्त होतील आणि मलाही या भाजप कार्यालयात सुरक्षारक्षक (गार्ड) ठेवायचा असेल, तर मी अग्निवीरलाच प्राधान्य देईन.

दरम्यान केंद्र सरकारने शनिवारी 'अग्निपथ' योजनेला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमिवर निमलष्करी दल आणि संरक्षण मंत्रालयांच्या नियुक्त्यांमध्ये "अग्नीवीर" यांच्यासाठी 10 टक्के आरक्षण जाहीर केले आणि इतर अनेक सवलतींची देखील घोषणा केली आहे.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. अग्निपथबाबतच्या सर्व शंका दूर झाल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे - भाजपचे कैलाश विजयवर्गीय. हा सत्याग्रह याच मानसिकतेविरुद्ध आहे असे म्हटले आहे.

विशेष म्हणजे कैलाश विजयवर्गीय हे पश्चिम बंगाल भाजपचे प्रभारी आहेत. वादग्रस्त विधानांमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. अग्निवीरांच्या मुद्द्यावर वक्तव्य करून त्यांनी पक्षाची कोंडी केली आहे. कैलास यांच्या वक्तव्यावर मध्यप्रदेशाती भाजप नेत्यांनी मात्र मौन बाळगले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT