BJP Leader Bandi Sanjay Kumar
BJP Leader Bandi Sanjay Kumar esakal
देश

Nizam Symbols : सत्तेत आलो तर घुमटांसह निजामांची सांस्कृतिक चिन्हं उद्ध्वस्त करू; भाजप नेत्याचा इशारा

सकाळ डिजिटल टीम

मुख्यमंत्र्यांचा सरकारी बंगला असलेल्या प्रगती भवनचंही प्रजा दरबारात रूपांतर केलं जाईल, अशी घोषणाही भाजप नेत्यानं केली.

तेलंगणात भाजपची (Telangana BJP) सत्ता आल्यास आम्ही निजामांच्या (Nizam) संस्कृतीचं प्रतिबिंब असलेल्या राज्य सचिवालयाचं घुमट पाडू, अशी घोषणा भाजप नेत्यानं केलीये.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बंदी संजय कुमार (Bandi Sanjay Kumar) म्हणाले, आम्ही सत्तेवर आलो तर नव्यानं बांधलेल्या सचिवालयाच्या घुमटांसह तेलंगणातील निजामांची सांस्कृतिक चिन्हं नष्ट करू. आम्ही भारतीय आणि तेलंगण संस्कृती दर्शविणारे योग्य बदल करू, असं त्यांनी स्पष्ट केलं.

"जनम गोसा-भाजप भरोसा" या कार्यक्रमांतर्गत कुकटपल्ली विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीतील बोईनपल्ली इथं पक्षाच्या बैठकीला संबोधित करताना ते बोलत होते. यादरम्यान मुख्यमंत्री केसीआर (KCR) यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले, 'सीएम केसीआर यांनी केवळ ओवैसींना खूश करण्यासाठी लोक सचिवालयाचं ताजमहालसारख्या समाधीत रूपांतर केलंय.'

मुख्यमंत्र्यांचा सरकारी बंगला असलेल्या प्रगती भवनचंही प्रजा दरबारात रूपांतर केलं जाईल, अशी घोषणाही भाजप नेत्यानं केली. रस्त्यांच्या विस्तारीकरणात अडथळे निर्माण करणारी प्रार्थनास्थळं सरकार पाडेल या मुख्यमंत्र्यांच्या विधानाला उत्तर देताना भाजप प्रदेशाध्यक्षांनी केसीआर यांना आव्हान दिलंय की, त्यांनी शक्य असल्यास हैदराबाद शहरातील जुन्या रस्त्यांवर पूल बांधावा. कुकटपल्लीतील गरीब लोकांच्या जमिनींवर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी अतिक्रमण केल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

Mallikarjun Kharge : ''राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील'' खर्गेंचा दावा; इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

SCROLL FOR NEXT