Neeraja Reddy Esakal
देश

Neeraja Reddy: महामार्गावर टायर फुटून मोठा अपघात, भाजप नेत्या नीरजा रेड्डी यांचा मृत्यू

टायर फुटल्याने कार पलटी झाली

अंकिता खाणे (Ankita Khane)

भाजपच्या माजी आमदार आणि कुरनूलच्या अलुरूच्या भाजप प्रभारी नीरजा रेड्डी यांचा काल रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे.

नीरजा रविवारी हैदराबादहून कर्नूलला येत असताना तेलंगणातील बीचुपल्ली येथे त्यांच्या कारचा टायर फुटला. अचानक टायर फुटल्याने कार पलटी झाली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात राष्ट्रीय महामार्ग 44 वर जोगुलांबा गढवाला जिल्ह्यातील इटिक्याला मंडळाच्या जिंकलापल्ली मंडळाजवळ झाला. या अपघातात अलुरू येथील नीरजा रेड्डी यांचा मृत्यू झाला. नीरजा रेड्डी हैदराबादहून कर्नूलला जात असताना टायर फुटल्यामुळे कार दुभाजकाला धडकली. या वेळी फॉर्च्युनर कार पलटी होऊन भीषण अपघात झाला.

या अपघातात नीरजा रेड्डी यांच्या डोक्याला आणि शरीराच्या इतर भागाला गंभीर दुखापत झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अर्धनग्न करत केस कापले, महिलेला अमानुष मारहाण, मंदिर प्रवेशाचा वाद, ठाण्यातील धक्कादायक प्रकार

Mobile Hacking Signs : तुमचा कॉल कुणी ऐकत आहे का? मेसेज सिक्रेटली वाचत आहे का? 'ही' आहेत मोबाईल हॅक झाल्याची 5 लक्षणे

शनी अमावस्येला विवाहिता मध्यरात्री मित्रासोबत अघोरी पूजेसाठी शेतात गेली; भोंदूबाबाने दोघांनाही संपवलं, धुळे हादरलं

Latest Marathi News Live Update : Mulshi: मुळशीत चांदे-मूलखेड रस्त्यावर रिक्षा आणि फॉर्च्युनर गाडीची जोरदार धडक

Global Economy: कोरोना, युद्ध अन् ऊर्जा संकटाने दशकभराच्या विकासावर पाणी; पुन्हा गरिबी ओढावण्याची भीती : PM मोदी

SCROLL FOR NEXT