bjp leader subramanian swamy moves delhi hc over centres failure to provide security  
देश

BJP: सुब्रमण्यम स्वामींची आपल्याच पक्षाच्या सरकारविरोधात कोर्टात धाव; केला मोठा आरोप

सकाळ डिजिटल टीम

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी गुरुवारी केंद्र सरकारविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या निवासस्थानी केंद्राने आतापर्यंत कोणतीही सुरक्षा पुरवली नसल्याचा दावा त्यांनी केला.

स्वामी यांचा राज्यसभा सदस्य म्हणून कार्यकाळ एप्रिलमध्ये संपला. त्यांच्या वकिलामार्फत उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत त्यांनी म्हटले आहे की, त्यांच्या अधिकृत निवासस्थानाचे पुन्हा वाटप करण्याच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान सरकारने कायम सुरक्षेचे आश्वासन दिले होते. मात्र आजपर्यंत अशी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. याप्रकरणी पुढील सुनावणी 31 ऑक्टोबरला होणार आहे.

स्वामींचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील जयंत मेहता यांनी सरन्यायाधीश सतीश चंद्र शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सांगितले की, न्यायालयाने माजी खासदार स्वामी यांना बंगला रिकामा करण्यासाठी सहा आठवड्यांचा अवधी दिला असताना, तेव्हा केंद्राने आश्वासन दिले होते की त्यांच्या घरात पुरेशी सुरक्षेची व्यवस्था केली जाईल.

न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी 14 ऑक्टोबर रोजी स्वामी यांना त्यांच्या अधिकृत बंगल्याचा ताबा सहा आठवड्यांच्या आत मालमत्ता अधिकाऱ्याला देण्याचे निर्देश दिले होते. हा बंगला त्यांना पाच वर्षांच्या कालावधीसाठी देण्यात आला होता, त्याची मुदत संपली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT