bjp swami vivekanand.jpg
bjp swami vivekanand.jpg 
देश

'80 टक्के घरांत विवेकानंदांचा फोटो लावल्यास पुढील 30 वर्षे राज्यात भाजपचीच सत्ता'

सकाळ वृत्तसेवा

आगरतळा- आपल्या वक्तव्यांमुळे त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले आहे. ईशान्य भारतातील 80 टक्के घरांमध्ये स्वामी विवेकानंद आणि त्यांच्या विचारांचे फोटो लावल्यास पुढील तीन दशकांपर्यंत भाजपचीच सत्ता राहील, असा दावा त्यांनी केला आहे. स्वामी विवेकानंद यांचे संदेश आणि त्यांचा फोटो कार्यकर्त्यांनी घरोघरी पोहोचवून नागरिकांना प्रेरित करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. 

मुख्यमंत्री देव पुढे म्हणाले की, मी माझ्या गावात पाहिलं आहे की, लोक त्यांच्या घरात कम्युनिस्ट नेते ज्योती बसू, जोसेफ स्टालिन, माओ जेडाँग यांचे फोटो लावतात. मग आपण स्वामी विवेकानंद यांचे फोटो घरात लावू शकत नाही का ? जर त्रिपुरातील 80 टक्के घरात स्वामी विवेकानंद यांचा फोटो लावला गेला तर आपले सरकार 30 ते 35 वर्षांपर्यंत टिकेल. आपल्या पक्षाचे संस्कार आणि आदर्शही कायम राहतील.

स्वामी विवेकानंद यांनी म्हटले आहे की, कमी बोला, शांत राहा आणि आपले काम सुरु ठेवा. जर आपण जास्त बोललो तर आपली ऊर्जा नष्ट होते. आपल्याला आपली ऊर्जा वाया घालवायची नाही. 

तत्पूर्वी, राज्यात ऑगस्टमध्ये कोविड-19 च्या रुग्णांना स्वामी विवेकानंद यांची पुस्तके वाटण्यात आली होती. ही पुस्तके वाचून रुग्ण मानसिकरित्या मजबूत आणि प्रेरित व्हावा यासाठी हा उपक्रम राज्य सरकारने राबवला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT