Mamata-Banerjee 
देश

निवडणूक आयोगाच्या मदतीशिवाय भाजपनं ५० चा आकडाही गाठला नसता - ममता बॅनर्जी

नंदीग्राममध्ये भाजपंच्या गुंडांनी मतमोजणीत छेडछाड केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दणदणीत विजयानंतर तृणमूल काँग्रेसच्या सर्वोसर्वा ममता बॅनर्जी यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. निवडणूक आयोगाच्या मदतीशिवाय भाजपला ५० पेक्षा अधिक जागाही मिळाल्या नसत्या, असा गंभीर आरोप ममता दीदींनी केला आहे. निवडणूक आयोगाचं पॅनल भाजपचं प्रवक्ता असल्यासारखं वागत होतं असंही त्यांनी म्हटलं आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

ममता म्हणाल्या, "यावेळी पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाची वागणूक भयानक होती. तृणमूलची यंदा डबल सेंच्युरी होईल आणि आम्ही २२१ चा आकडा गाठू असा आम्हाला विश्वास होता." असा विश्वास तुम्हाला का होता? या प्रश्नावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, "मी रस्त्यावर उतरुन लढणारी बाई आहे. पहिल्यापासूनच मी सांगत होते की आम्ही दोनशेपार जाऊ तर भाजप ७० पारही जाणार नाही. त्यामुळे जर निवडणूक आयोगानं भाजपला मदत केली नसती तर त्यांना ५० जागाही मिळाल्या नसत्या"

नंदीग्रामच्या पराभवावर ममता म्हणाल्या...

राज्यात तृणमूल काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला असला तरी नंदीग्राममध्ये ममतांचा पराभव झाला आहे. मात्र, हा निकाल चुकीचा असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्या म्हणाल्या, "नंदीग्राममधील पराभव हे आमचं नुकसान नाही. कारण या ठिकाणी मतमोजणीत छेडछाड करण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाकडे नंदीग्राममध्ये पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केली आहे. इतकं नव्हे तर मतदानाच्या दिवशी मी स्वतः मतदान केंद्राच्या बाहेर तीन तास बसून होते, कारण याठिकाणी कोणालाही मतदान करु दिलं जात नव्हतं"

ममता नंदीग्रामच्या निकालासाठी कोर्टात जाणार का?

ममता म्हणाल्या, "सध्या तरी आम्ही नंदीग्रामच्या निकालासाठी पुनर्रमोजणीची मागणी केली आहे. पोस्टल बॅलटची मतं आणि व्हीव्हीपॅटची मतं ही पुन्हा मोजली जायला पाहिजेत. भाजपच्या माफिया गँगने नंदीग्राममध्ये मतमोजणीत छेडछाड करण्याचं काम केलं आहे. लवकरच लोकांना यामागील सत्य कळेल"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed: गरोदर महिलेच्या पोटात ३० तास मृत बाळ; उपचारासाठी चालढकल, बीडमध्ये गंभीर प्रकार

India Pakistan Cricket Match: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या 'त्या' नववधुने केलं मोठं विधान!

Pro Kabaddi 12: पवन सेहरावतची हकालपट्टी! तमिळ थलायवाजने कर्णधाराला घरी पाठवण्याचं दिलं स्पष्टीकरण

Asia Cup 2025: बीसीसीआय भारत-पाकिस्तान सामना रद्द करू शकतं का? नेमका नियम काय आहे? वाचा...

Latest Marathi News Updates: धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पाठवले पत्र

SCROLL FOR NEXT