wedding 
देश

WhatsApp मुळे मांडवात गोंधळ; नवरदेवाला पाहताच नवरी गेली पळून

सकाळ डिजिटल टीम

पाटणा - सध्या व्हॉटटसअॅपचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. एखादा फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट पाठवण्यासाठी सोयीचं माध्यम म्हणून याकडे पाहिलं जातं. याच व्हॉटसअॅपवरून फोटो शेअरिंग करून लग्न ठरलेलं मात्र ऐनवेळी लग्न मांडवात वधुने लग्नाला नकार दिला. बिहारच्या बेतियामध्ये हा प्रकार घड़ला आहे. मांडवात नवरदेवाला पाहताच वधूने काढता पाय घेतला. व्हॉटसअॅपवर पाठवलेल्या फोटोवरून लग्न ठरवलं होतं. मात्र मंडपात जेव्हा वधुने नवरदेवाला पाहिलं तेव्हा लग्नाला नकार दिला. यामुळे वराती लग्नाशिवाय घरी परतले. 

बेतियामध्ये घडलेल्या या प्रकाराची चर्चा तिथे होत आहे. लग्नासाठी मंदिरात आलेल्या दोन्ही बाजुच्या मंडळींमध्ये वाद सुरु झाला. वधुची मोठी बहीण देवांती देवीने मुलीला मांडवातून नेल्याचा आरोप करण्यात आला. यावर वधु पक्षाने सांगितलं की, माझ्या मुलीला मुलगा पसंत नाही. यामुळे ती मांडवातून निघून गेली. 

वधुने व्हॉटसअॅपवर नवरदेवाचा फोटो पाहिला होता. त्यानंतर लग्न ठरले होते. मात्र प्रत्यक्षात जेव्हा नवरदेव समोर आला तेव्हा तिला मुलगा पंसत पडला नाही. लग्नाला आलेल्या एका पाहुण्यानं म्हटलं की, नातेवाइकांसह सगळे लग्न मांडवात होते. इथं नवरीच्या मोठ्या बहिणीनं तिला मांडवातून पळवून नेलं. 

नवरी मंडपातून पळून गेल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये अनेक तास वाद झाला. अखेर स्थानिकांनी मध्यस्थी करून त्यांना शांत केलं. मुलाचं आणि मुलीचं गाव बैरिया पोलिस ठाण्याचा हद्दीत आहे. या प्रकरणाची चर्चा भागात होत असली तरी याबाबत अद्याप कोणी पोलिसात गेलेलं नाही. कोणत्याही प्रकारची तक्रार दोन्हीपैकी कोणाकडूनच झालेली नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election : गोंधळच गोंधळ! नांदेडमध्ये मतदारांना कोंडलं, अंबरनाथला बोगस मतदार आणले, तर कोपरगावात उमेदवारांमध्ये बाचाबाची

मीराच्या डोळ्यांचा रंग का बदलला? इतके दिवस कुठे होती? 'तुला जपणार आहे'च्या अभिनेत्री सांगितलं खरं कारण, म्हणते- सेटवर मला...

Mumbai: ठाणे-सीएसएमटी प्रवास होणार सोपा! सायन उड्डाणपुलाला समांतर दोन पदरी पूल बांधणार; नवीन मार्ग कसा असणार?

Maharashtra Govt Scheme: आनंदी बातमी! या जोडप्यांना महाराष्ट्र सरकारकडून मिळणार 1.5–2.5 लाख रुपये; अर्ज कसा करावा ते जाणून घ्या

Girish Mahajan : 'हरित नाशिक'साठी ५० हजार वृक्षांचा संकल्प; मंत्री गिरीश महाजन यांची 'होमेथॉन'ला भेट

SCROLL FOR NEXT