cola scam main.jpg 
देश

कोळसा घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय मंत्र्याला 3 वर्षांचा कारावास

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली- कोळसा घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री दिलीप रे यांच्यासह तिघांना 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीबीआयच्या एका विशेष न्यायालयाने 1999 मध्ये झारखंडमधील एका कोळसा खाणीच्या वाटपातील अनियमतता संबंधित कोळसा घोटाळ्याप्रकरणी दिलीप रे यांना शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने नुकताच त्यांना दोषी ठरवले होते. 

विशेष न्यायाधीश भारत पराशर यांनी शिक्षा सुनावताना सर्व दोषींना 10 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. दिलीप रे यांच्याशिवाय कोळसा मंत्रालयाचे दोन तत्कालीन वरिष्ठ अधिकारी प्रदीपकुमार बॅनर्जी आणि नित्यानंद गौतम, केस्ट्रोन टेक्नॉलॉजी लि.चे (सीटीएल) संचालक महेंद्रकुमार अग्रवाल आणि केस्ट्रॉन मायनिंग लि.लाही (सीएमएल) दोषी ठरवले होते. न्यायालयाने सीटीएल 60 लाख रुपये तर सीएमएलला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. 

कोण आहेत दिलीप रे

दिलीप रे हे बिजू जनता दलाचे (बीजेडी) संस्थापक सदस्य आहेत. बिजू पटनायक यांच्या ते अत्यंत निकटवर्तीय होते. परंतु, नंतर त्यांनी आपला पक्ष बदलला आणि ते भाजपत सहभागी झाले. 2014 मध्ये भाजपच्या तिकीटीवर ते राऊरकेला येथून विधानसभेवर गेले. 2019 मध्ये निवडणुकीआधी त्यांनी भाजपचा त्याग केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास करण्याचे आश्वासन पूर्ण न केल्याचा आरोप केला. 

भाजपचा त्याग केल्यानंतर ते आपला पूर्वीचा पक्ष बीजेडीमध्ये दाखल होतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र ते राजकारणापासून दूर राहिले. आता कोळासा घोटाळ्याप्रकरणी त्यांना 3 वर्षांची शिक्षा झाली आहे. दरम्यान, रे यांचे वकील मनु शर्मा यांनी या निर्णयाला आव्हान देणार असल्याचे सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed: गरोदर महिलेच्या पोटात ३० तास मृत बाळ; उपचारासाठी चालढकल, बीडमध्ये गंभीर प्रकार

India Pakistan Cricket Match: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या 'त्या' नववधुने केलं मोठं विधान!

Pro Kabaddi 12: पवन सेहरावतची हकालपट्टी! तमिळ थलायवाजने कर्णधाराला घरी पाठवण्याचं दिलं स्पष्टीकरण

Asia Cup 2025: बीसीसीआय भारत-पाकिस्तान सामना रद्द करू शकतं का? नेमका नियम काय आहे? वाचा...

Latest Marathi News Updates : मोदींच्या एआय व्हिडीओमुळे पुण्यात भाजपचं आंदोलन

SCROLL FOR NEXT