‘आयबी’च्या प्रमुखांचाही कार्यकाल वाढविला sakal
देश

‘आयबी’च्या प्रमुखांचाही कार्यकाल वाढविला

केंद्र सरकारकडून अध्यादेश जारी

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आज तडकाफडकी अध्यादेश आणून संरक्षण सचिव, गृह सचिव, गुप्तचर विभाग- आयबीचे (इंटेलिजन्स ब्युरो) संचालक आणि केंद्रीय गुप्तहेर संघटना ‘रॉ’चे सचिव यांना दोन वर्षांची मुदतवाढ दिली आहे. यामुळे वरील सर्व पदांसाठीचा कार्यकाळ पाच वर्षांचा झाला आहे. .

केंद्राच्या अध्यादेशानुसार, लोकहित लक्षात घेता केंद्र सरकार संरक्षण सचिव, गृहसचिव, आयबी संचालक, ‘रॉ’चे सचिव, सीबीआय संचालक, ईडी संचालकांचा कार्यकाळ वाढवू शकते. या पदांसाठी कार्यकाळ एकावेळी दोन वर्षांपेक्षा अधिक वाढविता येणार नाही. २००५ मध्ये सरकारने या सचिव आणि संचालकांचा कार्यकाळ दोन वर्षे निश्चित केला होता. आता हा कार्यकाळ पाच वर्षांपर्यंत करण्याबाबतच्या अध्यादेशांना राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यानंतर आज त्यासंदर्भातील औपचारिक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली.

केंद्राच्या या निर्णयानंतर राजकीय वाद उफाळला आहे. महत्त्वाच्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या प्रमुखांचा कार्यकाळ वाढविण्याचा निर्णय तपास यंत्रणांचा यापुढेही गैरवापर करण्याची सरकारची प्रवृत्ती दर्शविणारा आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

सरकारवर टीका

मोदी-शहा यांना संसदेची पर्वा नाही

- डेरेक ओब्रायन, तृणमूल काँग्रेस

सरकारचा नेमका हेतू

काय?

- डी. राजा, भाकप

स्वतःची चौकशी टाळण्यासाठीच सरकारकडून अध्यादेश. ही घाई संशयास्पद.

- सीताराम येचुरी, माकप

मोदी सरकारची ही कार्यपद्धत चिंता वाढविणारी

- मनोज झा, राजद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: पिके करपली, दुष्काळाचे संकट गडद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले एनडीआरएफची वाट पाहणार नाही, आधीच शेतकऱ्यांना मदत देणार

खासदार ओमराजे निंबाळकरांना मोठा दिलासा, 'तो' गुन्हा रद्द; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

NSE IPO: देशातील सर्वात मोठा IPO खुला! 14 हजारांच्या गुंतवणुकीवर किती फायदा? कधी होणार लिस्टिंग? जाणून घ्या सर्व

Bijli Tigress: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वाघीण 'बिजली'चा मृत्यू

Gauri Avahan 2026: गौराई घरात घेताना माप ओलांडणं का महत्त्वाचं? सांडलेल्या धान्याचंही आहे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT