नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सर्व मारेकऱ्यांना मुक्त करण्याचे आदेश नुकतेच सुप्रीम कोर्टानं दिले होते. कोर्टाच्या या आदेशावर मोदी सकारनं नाराजी व्यक्त केली असून कोर्टाच्या आदेशाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. (Centre files review petition in SC against court order to release of all convicts in Rajiv Gandhi assassination case)
सुप्रीम कोर्टानं ११ नोव्हेंबर रोजी राजीव गांधी हत्याकांडातील सर्व सहा दोषींना मुक्त करण्याचे आदेश दिले होते. नुकतीच यांपैकी नलिनी श्रीहरन या महिलेची १२ नोव्हेंबर रोजी नुकतंच वेल्लोर जेलमधून सोडण्यात आलं. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधून अनेकांचे आभार मानले आहेत. राजीव गांधींच्या हत्येप्रकरणी दोषी आढळलेले नलिनी श्रीहरन आणि पी रविचंद्रन यांची जेलमधून मुक्तता करण्याचे आदेश कोर्टाने दिले. न्यायमूर्ती बीआर गवई यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं त्यांची वागणूक समाधानकारक असल्यानं त्यांच्या शिक्षेचा कालावधी पूर्ण होण्याआधीच त्यांची सुटका करण्याची परवानगी दिली होती.
दरम्यान, नलिनी श्रीहरन तब्बल ३० वर्षांनंतर तुरुंगाबाहेर येताच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मागच्या ३२ वर्षांमध्ये तमिळनाडूमधील लोकांचं सहकार्य मिळालं, त्यांचे मी आभार मानते. यांसह त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारचेही आभार मानले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.