देश

ईशान्येतील Article 371 ला हात लावणार नाही : अमित शहा

पीटीआय

गुवाहाटी : राज्यघटनेतील 370 वे कलम हे तात्पुरतेच होते; पण 371 वे कलम मात्र ईशान्येसाठीची विशेष तरतूद आहे. या दोन्ही कलमांमध्ये खूप फरक आहे. ईशान्येसाठीच्या या विशेष कलमाला आमचे सरकार कधीच हात लावणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केले. ते येथे ईशान्येकडील राज्याच्या परिषदेत बोलत होते. 

"केंद्र सरकारने जम्मू-काश्‍मीरमधील 370 वे कलम संपुष्टात आणल्यानंतर काही लोकांनी आता 371 व्या कलमावरून ईशान्य भारतामध्ये चुकीचा प्रचार करायला सुरवात केली आहे. केंद्र सरकार हे कलमदेखील संपुष्टात आणेल, असे लोकांना सांगितले जात आहे, या संदर्भात मी आधीच संसदेत स्पष्टीकरण दिले असून, आताही मी ईशान्य भारतातील काही बड्या मंत्र्यांच्या उपस्थितीत या बाबीचा पुनरुच्चार करतो आहे. सरकार या कलमाला कधीच धक्का लावणार नाही,'' असे शहा यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिकेबाबत (एनआरसी) लोकांच्या मनात अनेक प्रकारच्या शंकाकुशंका आहेत. एकाही घुसखोराला आमचे सरकार देशामध्ये राहू देणार नाही, हाच आमचा निर्धार आहे. आताही "एनआरसी' यादीच्या निर्मितीची प्रक्रिया कालबद्धरीतीने पूर्ण करण्यात आली होती, असे शहा यांनी नमूद केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smart Meter : 'ना कनेक्शन, ना वीज वापर'... तरी हजार रुपयांचं बिल; स्मार्ट मीटरच्या विश्वासार्हतेवर प्रश्न

Food Adulteration: राज्यातील अन्न व दूधभेसळ प्रकरणांवर कठोर कायदे करा; ग्राहक पंचायतीचे तुकाराम मुंढेंना निवेदन

Pune News: कात्रज तलाव परिसरात दुर्दैवी घटना! कठड्यावरून दरीत कोसळून ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Raigad News: मुसळधार पावसाचा कहर! पालीजवळ धोंडसे गावात मोठी दरड कोसळली; वीज खांब पडल्याने पाणीपुरवठा ठप्प

नागपूरमध्ये जंगलराज? सहा महिन्यांत ३० पिस्तुले, ६० काडतूसं अन् तलवारी जप्त, मध्य प्रदेशातून होतेय तस्करी

SCROLL FOR NEXT