देश

ईशान्येतील Article 371 ला हात लावणार नाही : अमित शहा

पीटीआय

गुवाहाटी : राज्यघटनेतील 370 वे कलम हे तात्पुरतेच होते; पण 371 वे कलम मात्र ईशान्येसाठीची विशेष तरतूद आहे. या दोन्ही कलमांमध्ये खूप फरक आहे. ईशान्येसाठीच्या या विशेष कलमाला आमचे सरकार कधीच हात लावणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केले. ते येथे ईशान्येकडील राज्याच्या परिषदेत बोलत होते. 

"केंद्र सरकारने जम्मू-काश्‍मीरमधील 370 वे कलम संपुष्टात आणल्यानंतर काही लोकांनी आता 371 व्या कलमावरून ईशान्य भारतामध्ये चुकीचा प्रचार करायला सुरवात केली आहे. केंद्र सरकार हे कलमदेखील संपुष्टात आणेल, असे लोकांना सांगितले जात आहे, या संदर्भात मी आधीच संसदेत स्पष्टीकरण दिले असून, आताही मी ईशान्य भारतातील काही बड्या मंत्र्यांच्या उपस्थितीत या बाबीचा पुनरुच्चार करतो आहे. सरकार या कलमाला कधीच धक्का लावणार नाही,'' असे शहा यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिकेबाबत (एनआरसी) लोकांच्या मनात अनेक प्रकारच्या शंकाकुशंका आहेत. एकाही घुसखोराला आमचे सरकार देशामध्ये राहू देणार नाही, हाच आमचा निर्धार आहे. आताही "एनआरसी' यादीच्या निर्मितीची प्रक्रिया कालबद्धरीतीने पूर्ण करण्यात आली होती, असे शहा यांनी नमूद केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Voter Fraud: बापरे! एकाच घरात ४ हजार २७१ मतदार; अधिकाऱ्यांनी केले हात वर, म्हणाले...

Latest Maharashtra News Updates : मुंबईकरांचे म्हाडाच्या लॉटरीतील घराचे स्वप्न लांबणीवर!

Gold Investment : 'पितृपक्षात सोने खरेदी करू नये' हा गैरसमज मोडीत; सराफ व्यावसायिकांचे निरीक्षण

US tariff on India update: अमेरिका लवकरच मोठा निर्णय घेणार! भारतावरील अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ हटवणार?

Neeraj Chopra कडून घोर निराशा! जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक राखण्यात अपयशी, टॉप-६ मध्येही स्थान नाही

SCROLL FOR NEXT