Yogi-Adityanath Team eSakal
देश

नाव बदलण्याची मालिका सुरूच; आता आझमगडचं नाव होणार...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत ते आज आझमगडमध्ये बोलत होते.

सुधीर काकडे

उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं सरकार आल्यापासून राज्यातील वेगवेळ्या शहरांची नावं बदलण्यात आली आहे. नाव बदलण्याच्या या योगी सरकाच्या मालिकेमुळे सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली आहे. त्यातच आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी आणखी एका शहराचं नाव बदलणार असल्याचा इशारा दिला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या एका सभेला संबोधित करत असताना योगी आदित्यनाथ यांनी आझमगडचे नाव बदलण्यात येणाऱ असल्याचा इशारा दिला आहे.

गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज आझमगड येथे एका सभेला संबोधित केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आझमगड मतदारसंघाचे नाव बदलण्याचा इशारा दिला आहे. लवकरच आझमड शहराचं नाव आर्यमगड होईल असं विधान त्यांनी यावेळी केलं आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आझमगडमध्ये सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी योगी आदित्यनाथ यांचं कौतुक करताना योगीजींनी जातीवाद, घराणेशाही आणि तुष्टीकरणाचं राजकारण संपवल्याचं संपवल्याचं विधान केलं. उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना ते म्हणाले की, 2015 पूर्वी उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था देशात 6 व्या क्रमांकावर होती आणि आज ती दुसऱ्या क्रमांकावर आहे. बेरोजगारीचा दर 4.1% पर्यंत कमी झाला. तसेच 40 वैद्यकीय महाविद्यालये आहेत, वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागा 3800 वर गेल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: सूर्यकुमारने UAE चा फलंदाज आऊट असतानाही फलंदाजीला परत का बोलावलं? जाणून घ्या नेमकं प्रकरण

KP Sharma Oli reaction : नेपाळमध्ये 'GEN-Z'च्या हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधानपद सोडावं लागलेल्या ओली यांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...

उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा मोठा निर्णय! सबळ कारणाशिवाय पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर; आरोपीस ताबडतोब मुक्त करण्याचा आदेश

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

SCROLL FOR NEXT