Bharat Jodo Yatra esakal
देश

Congress: काँग्रेसचं ठरलं! 'भारत जोडो'नंतर 'हात से हात जोडो' मोहीमेचा श्री गणेशा

भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेसने पुढील पक्ष वाढीची घोषणा केली

रुपेश नामदास

Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेसने पुढील पक्ष वाढीची घोषणा केली आहे. काँग्रेस कडून सांगण्यात आलं आहे की, 'भारत जोडो यात्रे'नंतर 26 जानेवारीपासून देशभरात 'हाथ से हाथ जोडो अभियान' सुरू करणार आहे. या प्रचारासाठी पक्ष ब्लॉक, पंचायत आणि बूथ स्तरावर जनसंपर्क करणार आहे.

ज्येष्ठ नेते पल्लम राजू हे या मोहिमेचे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत. १० जानेवारी रोजी विदर्भात प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीची विस्तारित बैठक होणार आहे. या बैठकीत हात से हात जोडोचा राज्यव्यापी कार्यक्रम निश्चित होईल. ‘भारत जोडो’ नंतरचा हा दुसरा टप्पा राजकीय प्रचारासाठी असेल. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत.

त्या माध्यमातून विधानसभेची तयारीही केली जाईल. काँग्रेसला महाराष्ट्रात कायम उत्तम प्रतिसाद मिळत असे. त्यामुळे पक्षाने या वर्षी महाराष्ट्रावर भर द्यायचा, असे ठरवले आहे. जेथे आमदार निवडून येऊ शकतील त्या भागावर भर दिला जाईल.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विदर्भासह अन्य सर्व भागांतील नेत्यांशी संपर्क ठेवला आहे. विदर्भावर भर देणे राजकीय फायद्याचे ठरेल, अशी आशा असल्याने कार्यकारिणी बैठक तेथे आयोजित करण्यात आली आहे. या भागासाठीचा कार्यक्रम निश्चित होईल.

महाराष्ट्राचा आराखडा तयार करा

महाराष्ट्र हे महत्त्वाचे राज्य असल्याने राज्याचा आराखडा तयार करण्याचे आदेश काँग्रेस श्रेष्ठींनी दिले आहेत. तीन माजी मुख्यमंत्री असलेल्या या राज्यात विधानसभेच्या जागा दुपटीने वाढतील का, याचा अंदाज घेतला जात आहे.

पल्लम राजू यांनी यासंदर्भात राज्याच्या महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा करणे सुरु केले आहे. प्रत्येक जिल्ह्याचा एक प्रमुख आणि त्यांना साहाय्य करण्यासाठी दोन प्रभारी नेमले जातील.विद्यमान आमदार तसेच त्या त्या मतदारसंघातील पराभूत नेत्यांनाही या विचारप्रक्रियेत सहभागी केले जाते आहे.

कोपरा सभा, तालुकास्तरावर चौक सभा, जिल्हास्तरावर मेळावे असे आयोजन केले जाते आहे. भाजपच्या राजवटीत महागाई वाढली, धर्माच्या राजकारणाचा उपयोग करत धुव्रीकरण करण्याचे प्रयत्न, बेरोजगारीत झालेली वाढ या मुद्द्यांवर ‘हात से हात जोडो’ मोहिमेत विशेष लक्ष दिले जाईल.

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने लवकरच निवडणुका होत आहेत. त्यामुळेच येथे ‘हात से हात जोडो’ मोहिमेत राजकारण हा केंद्रबिंदू ठरेल असे काँग्रेस नेत्याने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake: लक्ष्मण हाकेंना बीडमध्येच एवढा पाठिंबा का मिळतो? गेवराईत मराठा समाजातल्या मुलींबद्दल आक्षेपार्ह विधान

जान्हवी जयंतला शिक्षा देणार! पण प्रोमो पाहून प्रेक्षक नाही झाले इम्प्रेस, "पुन्हा ये रे माझ्या मागल्या"

Sanjay Raut : नाशिक दत्तक घेतले मग समस्या का सुटत नाहीत? संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल

Latest Marathi News Updates : जळगावात 17 सप्टेंबरला धडकणार शेतकरी जनआक्रोश मोर्चा

Medicine MRP Change: औषधं आणि वैद्यकीय उपकरणं स्वस्त होणार! केंद्र सरकारचा नवा आदेश लागू, अंमलबजावणी कधी करणार?

SCROLL FOR NEXT