देश

"गोडसे-सावरकरांच्या RSS विचारधारेशी समझौता कधीच शक्य नाही"

विनायक होगाडे

नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने आक्रमकपणे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करताना दिसून येतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी मान्य असलेला व्यक्ती काँग्रेसचा कार्यकर्ता असूच शकत नाही, अशी ठाम मांडणी राहुल गांधींनी यापूर्वीही केली आहे. हीच मांडणी पुढे रेटत आज राहुल गांधींनी पुन्हा एकदा RSS च्या विचारधारेवर कोरडे आसूड ओढले आहेत. आज ते दिल्लीमध्ये ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या वर्धापन दिनी नव्या लोगोचं अनावरण करताना बोलत होते.

RSS च्या विचारधारेशी समन्वय नाही

काँग्रेस नेत राहुल गांधी यांनी म्हटलंय की, काँग्रेसची विचारधारा ही भाजप आणि RSS च्या विचारधारेहून भिन्न आहे. एक काँग्रेस कार्यकर्ता म्हणून मी बाकी विचारधारांसोबत काही ना काही समझौता करु शकतो; मात्र RSS आणि भाजपच्या विचारधारेसोबत मी कसल्याही प्रकारचा समझौता करु शकत नाही. आपल्यासाठी खरंच मोठा प्रश्न आहे की, महात्मा गांधींची काँग्रेस आणि गोडसे आणि सावरकरांच्या विचारधारेमध्ये काय फरक आहे.

भाजप धर्माची दलाली करते

भाजपवाले स्वत:ला हिंदू पक्ष म्हणवून घेतात आणि संपूर्ण देशामध्ये लक्ष्मी आणि दुर्गेवर आक्रमम करतात. हे लोक जिथे जातात तिथे काही ठिकाणी लक्ष्मीला मारतात तर काही ठिकाणी दुर्गेला मारतात. हे हिंदू धर्माचा वापर करतात, हे धर्माची दलाली करतात. मात्र, हे लोक हिंदू नाहीत.

गांधींना RSS च्या विचाधारेने का मारलं?

गेल्या 100-200 वर्षांमध्ये जर कुणा व्यक्तीने हिंदू धर्माला जाणून घेतलं असेल तर त्या व्यक्तीचं नाव महात्मा गांधी आहे. ही गोष्ट आपण आणि RSS-भाजपचे लोक देखील मान्य करतात. मात्र, जर महात्मा गांधींनी हिंदू धर्माला समजून घेत आपलं संपूर्ण आयुष्य हिंदू धर्मासाठी वाहून दिलं तर RSS च्या विचारधारेने त्या हिंदूच्या छातीमध्ये तीन गोळ्या का झाडल्या? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JPSC-JSSC परीक्षांवरून मोठा ट्विस्ट! भरती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय थांबवला; झारखंड सरकारला हायकोर्टाचा मोठा झटका

‘रात्री जेवणाचा प्रश्न असतो म्हणून तिचं कौतुक करतो’ अशोकमामा निवेदिता यांच्याबद्दल बोलताना म्हणाले; 'मला संसारातलं...'

Palghar Corruption: पालघर महावितरणचा वायरमन आठ हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; जास्तीचे वीज बिल कमी करण्याचे आमिष

Pakistan News: शहबाज शरीफ सरकारला मोठा धक्का! पाकिस्तानातील २५ मंत्रालये बनावट; तातडीने बरखास्त करण्याची शिफारस

Latest Marathi News Live Update: पालघर महावितरणचा कर्मचारी लाच घेताना अटक

SCROLL FOR NEXT