rahul gandhi. 
देश

'खेती बचाओ' यात्रा सुरु; राहुल गांधी म्हणाले, 'सत्तेवर येताच कृषी विधेयक मागे घेणार'

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली पंजाबमधील मोगा येथे 'खेती बचाओ' रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि हाथरस प्रकरणावरुन उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर टीकास्त्र सोडले. कोरोना काळात हे 3 विधेयक लागू करण्याची काय गरज होती, असा सवाल त्यांनी केला. पंतप्रधान म्हणतात की, शेतकऱ्यांसाठी कायदे केले जात आहेत. जर शेतकऱ्यांसाठी कायदे केले जात असतील तर लोकसभा, राज्यसभेत खुली चर्चा का झाली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. काँग्रेस पक्ष सत्तेत आला तर हे तीन काळे कायदे संपुष्टात आणले जातील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. 

बागेत सापडलेल्या एका वस्तूने केरळला जोडलं थेट रोमन साम्राज्याशी

योगी सरकारवर हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये परिस्थिती इतकी वाईट आहे की, ज्या कुटुंबातील मुलीचा मृत्यू झाला आहे, त्यांनाच मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी धमकी देत आहेत. संपूर्ण भारतात ही स्थिती आहे. गुन्हेगारांना काहीच झालं नाही पण पीडित कुटुंबाविरोधातच कारवाई केली गेली, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 

कृषी विधेयकाबाबत बोलताना ते म्हणाले की, जर शेतकरी या कायद्यामुळे आनंदी असतील तर देशभरात आंदोलनं का केली जात आहेत. पंजाबचा प्रत्येक शेतकरी आंदोलन का करत आहे? मी तुम्हाला खात्री देतो की, ज्या दिवशी काँग्रेसचे सरकार सत्तेवर येईल. त्यावेळी हे तीनही काळे कायदे हटवून कचऱ्यात फेकू, असे आश्वासनही त्यांनी दिले. 

Hathras case: पीडिता आणि आरोपींच्या कुटुंबात 23 वर्षांपासून वैर

काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू खूप दिवसानंतर पक्षाच्या सार्वजनिक कार्यक्रमात दिसले. ते म्हणाले की, अमेरिकेची फसलेली पॉलिसी आपल्यावर थोपवण्याचा प्रकार केला जात आहे. उद्योगपती देश चालवत आहेत. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या फायद्याला 'अनुदाना'चे लेबल लावले जात आहे. तर श्रीमंतांना देण्यात येणाऱ्या लाखो रुपयांच्या सवलतींना 'इन्सेंटिव्ह' म्हटले जाते, अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारला टोला लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT