Mani Shankar Aiyer google
देश

''हिंदू धर्माचं पालन करणारे ८० टक्के लोक भाजपसाठी खरे भारतीय''

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर (Congress Leader Mani shankar Aiyer) यांनी हिंदू धर्म (Hindu religion) आणि हिंदूत्वावरून (Hindutva) भाजपवर टीका केली आहे. ''हिंदू धर्माचे पालन करणारे फक्त ८० टक्के लोकच भाजपसाठी (BJP) खरे भारतीय आहेत'', असं वक्तव्य अय्यर यांनी केलं आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते.

''हिंदू धर्म आणि हिंदूत्वामध्ये फरक आहे, असं राहुल गांधी म्हणाले होते. तो फरक हाच आहे की जे हिंदू धर्मावर विश्वास ठेवतात ते शंभर टक्के भारतीय आहेत. आपण या देशात राहणाऱ्या प्रत्येकाला भारतीय मानतो. पण, सत्तेत बसलेले लोक असं मानत नाहीत. ते हिंदू धर्माचं पालन करणाऱ्या ८० टक्के लोकांनाच खरे भारतीय मानतात'', असं मणिशंकर अय्यर म्हणाले.

राहुल गांधींनीही केली होती टीका -

गेल्या आठवड्यात, काँग्रेस नेते राहुल गांधींनी देखील हिंदू धर्म आणि हिंदूत्वावरून भाजप-आरएसएसच्या विचारसरणीवर टीका केली होती. या दोन वेगवेगळ्या गोष्टी असल्याचे ते म्हणाले होते. "हिंदू धर्म म्हणजे शीख किंवा मुस्लिमांना मारहाण करणे आहे का? हिंदूत्वामध्ये अर्थातच ते आहे. ते कोणत्या पुस्तकात लिहिलेले आहे? मी ते पाहिले नाही. मी उपनिषद वाचले आहेत. हिंदू धर्म आणि हिंदूत्व यात काय फरक आहे? ते एकच आहेत का? ते एकच असू शकतात का? जर ते एकच आहेत, तर त्यांचे नाव एकच का नाही? त्यांचे वेगळे नाव का आहे? तुम्ही हिंदूत्व हा शब्द का वापरता? साहजिकच त्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत'', असं राहुल गांधी म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I : गौतम गंभीर चूक सुधारणार, Vaibhav Sooryavanshi ला संधी देणार! इंग्लंडविरुद्ध तगडी प्लेइंग इलेव्हन...

Lalitpur Silk Saree: बनारसी-कांजीवरमच्या गर्दीत हरवलेला बुंदेलखंडचा खजिना! ललितपूरची झरी सिल्क साडी का आहे खास?

Latest Marathi News Live Update : पुण्यात गव्यामुळे एकच खळबळ! कॅनलमध्ये अडकलेल्या गव्याला वाचवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न

Kolhapur BJP Corporator : कोल्हापुरात राजकीय भूकंप? भाजपच्या रिंकू देसाईंचे नगरसेवकपद धोक्यात आल्याच्या वृत्ताने खळबळ; नेमकं काय घडलं?

Railway: मध्य रेल्वेकडून दिलासा! विठुरायाच्या दर्शनासाठी ५४ विशेष गाड्या; तिकीट बुकिंग कधीपासून सुरू होणार? तारीख समोर, पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT