Harshwardhn-Jadhav 
देश

प्रगत देशांच्या तुलनेमध्ये भारतातील कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - देशातील कोरोनाचा संसर्ग  नियंत्रणात असून जगातील अन्य प्रगत देशांच्या तुलनेमध्ये आपल्याकडची स्थिती समाधानकारक आहे. भविष्यातील कोणत्याही भीषण परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी व्यक्त केला.

देशभरातील घडामोडी वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जगातील सर्वांत कमी मृत्युदर भारतामध्ये असून हे प्रमाण ३.३ टक्के एवढे असल्याचा दावा त्यांनी केला.

हर्षवर्धन म्हणाले की, ‘‘उपचारानंतर बरे होणाऱ्यांचे प्रमाण  (रिकव्हरी रेट) २९.९% इतके वाढले आहे. हा अत्यंत चांगला संकेत आहे.

देशभरातील रुग्णांची संख्या ६० हजाराच्या जवळपास पोहोचली असून सरकारच्या आकडेवारीनुसार मृतांची संख्या १ हजार ९८१ एवढी झाली आहे. मागील २४ तासांत  ३ हजार ३२० नवे रुग्ण आढळून आले आहेत.

राहुल यांच्यावर टीका 
आरोग्य सेतू ॲप वर संशय घेणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर भाजपने जोरदार टीका केली. अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी राहुल गांधी यांच्यावर, कोरोना संसर्गाच्या  काळात  समाजात विनाकारण भीती पसरविल्याचा आरोप केला. सध्याच्या काळात ''होप''ची (आशेची)  आवश्यकता असताना काँग्रेस नेते हॉररवर भर देत आहेत, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे टोमणे मारणे आणि टीका करण्यापलिकडे काही करू शकत नाहीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांचा टोला

Indian Stock Market Opening : शेअर बाजारात हिरव्या रंगात उघडला; सेन्सेक्स 330 अंकांनी वाढला; जाणून घ्या कोणते शेअर्स तेजीत?

Latest Marathi Live Update News: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आमरण उपोषण सुरू

Wardha Accident: कंटेनर-कार अपघातात तीन मित्र ठार; अल्लीपूर -धोत्रा मार्गावरील एकुर्ली फाट्याजवळची घटना

India vs Australia 4th T20: आता शुभमन गिलच्या फॉर्मची प्रतीक्षा; भारत-ऑस्ट्रेलिया आज चौथा टी-२० सामना, आघाडीसाठी प्रयत्न

SCROLL FOR NEXT