bihar-map 
देश

महानगरांमधून बिहारमध्ये परतणासाठी सरकारचा 'वेगळा' निर्णय

उज्वलकुमार

पाटणा - कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवसांच्या टाळेबंदीची घोषणा केल्यानंतर देशाच्या सर्व भागांमधून बिहारमध्ये परतणाऱ्या कामगारांना राज्याच्या सीमावर्ती भागांमध्ये विलगीकरणात ठेवण्यात येणार असल्याचे राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

देशभरातील व्यवसाय बंद झाल्याने आपापल्या गावी परतणाऱ्या कामगारांना राज्यांच्या सीमावर्ती भागात असणाऱ्या शाळा आणि कॉलेजमध्ये ठेवण्यात येणार असून सध्या या ठिकाणी तीन ते पाच हजार नागरिकांना विलगीकरणात ठेवण्याची तयारी करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. केंद्रीय कॅबिनेट सचिव व गृहसचिवांसह गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अमीर शमनी आणि डीजीपी यांच्या समवेत बिहारचे मुख्य सचिव दीपक कुमार यांनी शनिवारी उशिरा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्य सरकारने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून केलेल्या तयारीचा आढावा दिला. तसेच राज्य सरकार उत्तर प्रदेश आणि दिल्ली सरकारच्या सतत संपर्कात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

अतिरिक्त मुख्य सचिव आमिर रौतानी यांनी सांगितले, की इतर राज्यातून नागरिक यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बिहारला जोडणाऱ्या इतर राज्यांच्या रस्त्यांवरील सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये या नागरिकांना ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी त्यांची भोजनाची व इतर व्यवस्था केली असून येथे त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

Jalna News : पाणी आणण्यासाठी डाव्या कालव्यावर गेलेल्या ऊसतोड मजुराच्या मुलीचा पाण्यात बुडुन मृत्यु; तीन दिवसांनंतर सापडला मृतदेह

Mumbai Local: पैसे कट झाले, तिकीट नाही! मुंबई लोकलची ‘सरल’ सेवा प्रवाशांच्या मदतीला, कसे कामी येणार?

Inspirational : Glenn Phillips ची पायलट बनण्यामागची कहाणी; ८ महिने क्रिकेटपासून दूर, पण पठ्ठ्याला स्वस्थ कुठे बसवत होतं...

SCROLL FOR NEXT