नरेंद्र मोदी 
देश

तौक्तेनंतर 'यास'चं संकट, मोदींनी बोलवली महत्वाची बैठक

नामदेव कुंभार

Cyclone Yaas : भारताच्या पश्‍चिमी किनारपट्टीवर ‘तौक्ते’ चक्रीवादळाने धुमाकूळ घातल्यानंतर आता पूर्व किनारपट्टीवर आणखी एका चक्रीवादळासाठी पोषक वातावरण आहे. 'यास' चक्रीवादळाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आला आहे. 'यास' चक्रीवादळ ईशान्येकडे सरकणार आहे. ते बुधवारपर्यंत ओडिशा आणि बंगालच्या किनारपट्टीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान ओडिशा, पश्‍चिम बंगाल, आसाम आणि मेघालयामध्ये मंगळवारपासून हलक्या पावसाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर या पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यताही वर्तवली आहे. तौक्ते चक्रीवादळानं नुकतंच देशाच्या पश्चिम किनारपट्टीला झोडपून काढलं होतं. तौक्तेमुळं संपूर्ण जवजीवन विस्कळीत झालं होतं. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि केरळमध्ये चक्रीवादळानं हाहा:कार माजवला होता. यामध्ये 30 जणांचा मृत्यू झाला होता. तौक्ते चक्रीवादळासारखं नुकसान पुन्हा होऊ नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उच्च स्तरिय बैठक बोलवली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यास चक्रीवादळाच्या पुर्वतयारीसाठी रविवारी उच्चस्तरिय बैठक बोलवली आहे. यामध्ये वरीष्ठ सरकारी आधिकारी, एनडीए, दूरसंचार सचिव, ऊर्जा, नागरी उड्डाण मंत्रालयाचा समावेश असणार आहे. याशिवाय गृहमंत्री आणि इतर मंत्रायलायांना यामध्ये सहभाग नोंदवण्यास सांगितलं आहे. रविवारी ही बैठक पार पडणार आहे. यामध्ये यास चक्रीवादळापासून बचाव करण्याची योजना आखली जाणार आहे.

अंदमान समुद्र आणि बंगालच्या पूर्व-मध्य उपसागरात शनिवारी कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाले आहे. या क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने येत्या बुधवारी (ता. २६) आणि गुरुवारी (ता.२७) हे चक्रीवादळ पूर्व किनाऱ्यावर धडकणार आहे. हे चक्रीवादळ तीन दिवस असण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर होत असताना बंगालच्या उपसागरात व अंदमान सागरात ताशी ४५ ते ५५ किमी वेगाने वारे वाहू शकतात. ते बंगालच्या खाडीपर्यंत येईपर्यंत ताशी ७० किमीची वेग पकडू शकतात.या चक्रीवादळामुळे या काळात कोणत्याही मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये. तसेच किनारी भागातही राहू नये असा इशारा देण्यात आला आहे.

नौदल, तटरक्षक दल सज्ज

ओडिशातील १४ ते ३० जिल्ह्यांवर या चक्रीवादळाचा परिणाम होणार असून या जिल्ह्यांना हायअलर्टचा इशारा देण्यात आला आहे. या वादळामुळे समुद्रात निर्माण होणाऱ्या आपत्कालिन परिस्थितीसाठी भारतीय नौदलाला आणि तटरक्षक दलाला सज्ज राहण्याची विनंती ओडिशा सरकारने केली आहे. तसेच रेल्वेने बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेशला जाणाऱ्या २२ विशेष गाड्या रद्द केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commerce Graduates Protest : शासकीय भरती प्रक्रियेत कॉमर्स पदवीधरांवर अन्याय, विद्यार्थ्यांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

टोलचे १०० रुपये वाचवायला शॉर्टकट घेतला, पण इंजिनिअरनं गमावला जीव; १५ दिवसांपूर्वी घेतलेली नवी कार

Latest Marathi News Live Update : पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक मतदान पेट्या ने-आण करण्यासाठी पीएमपीएम एलच्या १ हजार ५६ बसेस धावणार

बिग बॉस सीजन 3 विजेत्या विशाल निकमने शेअर केले खऱ्या सौंदर्यासोबत फोटो ! 'या' अभिनेत्रीला करतोय डेट

Solapur Crime: बीड जिल्ह्यातील डॉक्टरास गर्भलिंगनिदान प्रकरणी अटक; बार्शीतील प्रकरण, तीनही संशयितांना पोलिस कोठडी!

SCROLL FOR NEXT