nitish kumar
nitish kumar 
देश

बिहारमध्ये काय पडसाद उमटले झारखंडच्या पराभवाचे वाचा

सकाळ न्यूज नेटवर्क

पाटणा - झारखंड निवडणुकीतील पराभवाचे पडसाद बिहारमध्येही पडण्याची चिन्हे आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने ‘बिहारमध्ये नितीशकुमार नको,’ अशी भूमिका मांडण्यास सुरुवात केली होती. यासाठी नितीशकुमार यांच्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. मात्र, झारखंडमधील पराभवानंतर संयुक्त जनता दलानेच (जेडीयू) भाजपला सल्ले देण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. 

‘भाजपने आपल्या मित्रपक्षांशी समन्वय राखून त्यांच्यासह झारखंडमध्ये निवडणूक लढविली असती तर हा दिवस दिसला नसता,’ अशा कानपिचक्‍या ‘जेडीएस’ने दिल्या आहेत. यावरूनच बिहारच्या राजकारणाचा रोख बदलण्यास सुरुवात झाल्याचे दिसत आहे.

झारखंडमधील भाजपचा मित्रपक्ष ऑल झारखंड स्टुडंट युनियन (एजेएसयू) यांची युती न होता, हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. तसेच बिहारमधील भाजपचे आघाडीतील पक्ष ‘जेडीएस’ आणि लोकशाही जनता पक्षांमध्येही बिहारमध्ये युती होऊ शकली नव्हती. तेथे या दोन्ही पक्षांना खातेही उघडता आले नसले तरी, ‘जेडीएस’चे प्रवक्ते संजयसिंह यांनी भाजपने त्यांच्या मित्रपक्षांना बरोबर घ्यायला हवे होते, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Hemant Karkare: अन् करकरेंच्या पत्नीने नाकारले मोदींचे एक कोटी रुपये, 16 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

Jalgaon Summer Heat : मतदान केंद्रावर मिळणार ‘ग्लुकोज-डी, ओआरएस, बीपी, शुगर’ची गोळी; मतदारांनो, बिनधास्त पडा घराबाहेर

Pune Loksabha election 2024 : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकर यांचा स्वतंत्र जाहीरनामा; नवीन आश्वासनं कोणती?

Gold Rate Today: सोन्या-चांदीची चमक पुन्हा वाढली; काय आहे या वाढीमागचे कारण?

SCROLL FOR NEXT