Delhi Farmer Protest Esakal
देश

Delhi Farmer Protest: दिल्ली सीमेवरील तणाव कमी, सिंघू आणि टिकरी सीमा १२ दिवसांनी पुन्हा खुल्या; उर्वरित मार्गांची जाणून घ्या स्थिती

singhu and Tikri borders to partially reopen: शेतकऱ्यांनी 'दिल्ली मार्च' 29 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलल्यानंतर पोलिसांनी शनिवारी दिल्लीच्या विविध सीमेवरील नियम शिथिल केले आहेत. टिकरी आणि सिंघू सीमेवर पुन्हा वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

शेतकऱ्यांनी 29 फेब्रुवारीपर्यंत आंदोलन पुढे ढकलल्यानंतर, पोलिसांनी काल(शनिवारी) दिल्लीच्या विविध सीमेवर बॅरिकेड्स आणि नियम शिथिल केले आहेत. टिकरी बॉर्डर आणि सिंघू बॉर्डरवर पुन्हा वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. दोन्ही ठिकाणी दिल्लीहून हरियाणात जाण्यासाठी आणि तेथून येण्यासाठी प्रत्येकी एक लेन खुली करण्यात आली आहे. दुसरीकडे, पोलिसांनी गाझीपूर सीमेवरील अनेक बॅरिकेड्सही हटवले आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कमी झाली आहे.(Sealed since February 13 singhu and Tikri borders to partially reopen)

रस्त्यांवरील बॅरिकेड्स हटवण्यात आल्याने प्रवाशांना दिलासा

शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून दिल्ली पोलिसांनी शनिवारी बहुतांश ठिकाणांवरील बॅरिकेडिंग हटवण्यात आले. 29 फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच न करण्याते पाऊल उचलले आहे. त्यामुळे सीमेपासून दिल्लीच्या अंतर्गत रस्त्यांपर्यंत लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शनिवारी लोकांना दिल्लीच्या सीमावर्ती भागातच नव्हे तर अंतर्गत रस्त्यांवरही वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर काही ठिकाणचे बॅरिकेड्स पूर्णपणे हटवण्यात आलेले नाहीत, त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

गेल्या 10 दिवसांपासून दक्षिणेकडून नवी दिल्लीत प्रवेश करणाऱ्या न्यू मोतीबाग रस्त्यावर पोलिसांनी बॅरिकेड्स लावले होते. कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती, मात्र शेतकऱ्यांनी दिल्लीकडे निघणारा मोर्चा २९ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलल्याने पोलिसांनी शनिवारी बॅरिकेड्स हटवले. त्यामुळे मार्ग मोकळा होऊन वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला.

सामान्य दिवसांप्रमाणेच वाहतूक सुरळीत राहिली. मथुरा रोडवरील नीला गुंबडजवळ शनिवारीही सामान्य दिवसांप्रमाणेच वाहतूक सुरळीत होती. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता, तर शनिवारी वाहतूक सुरळीत झाली.

शनिवारी दुपारी आयटीओच्या आसपास वाहनांचा वेग खूपच कमी होता. याठिकाणी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स हटवण्यात आले असले तरी येथे ठेवण्यात आलेले कंटेनर अद्यापही मार्गात अडथळा ठरत आहेत. शेतकऱ्यांचे आंदोलन अद्याप संपलेले नाही, त्यामुळे हे कंटेनर अद्याप हटविण्यात आलेले नाहीत. आयटीओसोबतच शनिवारी अक्षरधाम आणि विकास मार्ग विस्तारावरही वाहनांचा वेग कमी होता.टिळक पुलाखालून पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स अद्याप पूर्णपणे हटवलेले नाहीत. येथे एक सर्व्हिस लेनही बॅरिकेड्स लावून बंद ठेवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Election Campaign : यायला-जायला वाहन, अन् रोजच्या रोज पैसे बी! महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात रॅलीतील शेतमजूर महिलांना रोजगार

Weekly Love Horoscope 12 to 18 January 2026: शुक्र मकर राशीत प्रवेश करताच ‘या’ लोकांच्या लव्ह लाईफमध्ये वाढणार गोडवा

Makar Sankranti 2026: संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत लहान मुलांना बोरन्हाण का आणि कसं घालतात? वाचा यामागचं खरं कारण

Ajit Doval: आपली मंदिरे लुटली, आपण गप्प पाहत राहिलो… आता इतिहासाचा ‘बदला’ घ्यायची वेळ; अजित डोवाल यांचा थेट इशारा

Nashik Zilla Parishad : बोगस दिव्यांगांचे धाबे दणाणले; नाशिक जिल्हा परिषदेच्या १०६ कर्मचाऱ्यांची मुंबईत होणार तपासणी

SCROLL FOR NEXT