Arvind Kejriwal 
देश

Free Electricity : मोफत विजेवरून दिल्लीत खडाजंगी

मोफत विजेसाठी आप सरकारकडून दिल्या जाणाऱ्या वीज अनुदानाबाबात चौकशी

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : दिल्लीतील मोफत विजेसाठी आप सरकारकडून दिल्या जाणाऱ्या वीज अनुदानाबाबात चौकशी करून सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी दिले आहे. यामुळे नायब राज्यपाल व आप सरकारमध्ये नवे युद्ध सुरू झाले. गुजरातमध्ये मोफत वीजेचे आकर्षण वाढल्यामुळे दिल्लीतील मोफतजना बंद पाडण्याचा हा डाव असल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला.

एलपीजी अनुदानाप्रमाणे विजेवरील अनुदान ग्राहकांच्या थेट खात्यात जमा करण्याचा प्रस्ताव दिल्ली वीज नियामक आयोगाने २०१८ मध्ये दिला होता. अद्याप त्याची अंमलबजावणी का झाली नाही, याची चौकशी करण्याचे आदेश आहेत.

अंमलबजावणी रखडण्यामागे भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. आपचे प्रवक्ता आणि संवाद आयोगाचे उपाध्यक्ष जस्मिन शाह, आप खासदार एन. डी. गुप्ता यांचे पुत्र नवीन गुप्ता यांना बीआरपीएल आणि बीवायपीएल या वीज वितरण कंपन्यांमध्ये संचालक बनविण्यात आले.

दिल्ली सरकारची ४९ टक्के भागीदारी असलेल्या दोन्ही वीज वितरण कंपन्या अनिल अंबानी ग्रुपच्या आहेत. या कंपन्यांकडे दिल्ली सरकारची २१२५० कोटी रुपयांची थकबाकी असताना सरकारने केवळ ११५५० कोटी रुपये घेऊन प्रकरण निकाली काढल्याचा त्याचप्रमाणे विलंबाने बिल भरणाऱ्या ग्राहकांकडून १८ टक्के विलंब शुल्क आकारणी आणि सरकारला १२ टक्क्याने भरपाई करणे यातूनही या कंपन्यांनी ८५०० कोटी कमाई केल्याचा आरोप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case : आयुषच्या खूनापुर्वी आरोपींची एकत्रित बैठक; वनराज आंदेकरची पत्नी अटकेत, पुरवणी जबाबात सोनालीचा सहभाग असल्याची माहिती

पंचनाम्याचे निकष शेतकऱ्यांच्या जिव्हारी! अतिवृष्टीच्या भरपाईसाठी ‘हे’ निकष अडचणीचे; ॲग्रीस्टॅक क्रमांक, ई-पीक पाहणी नोंदीचा अडथळा; शेतातील जिओ टॅगिंग फोटोचीही अट

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

संगमनेरकरांना मोठा दिलासा! आमदार खताळ यांच्यामुळे भूखंड आरक्षणावर निघाला तोडगा

Latest Maharashtra News Updates : बंगळूर ते पुणे विमान मुंबईच्या दिशेने वळवले

SCROLL FOR NEXT