राहुल गांधी esakal
देश

देशांतर्गत दुभंगलेला भारत आता बाहेरुन कमकुवत झालाय - राहुल गांधी

नुपूर शर्मा प्रकरणावरुन राहुल गांधींनी केंद्रातील भाजप सरकारवर सडकून टीका केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : मुस्लिम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी आक्षेपार्ह विधान केल्यानं आखाती देशातून भारतावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. भारतानं माफी मागावी अशी मागणी काही मुस्लिम राष्ट्रांनी केली आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजप सरकारवर सडकून टीका केली आहे. देशांतर्गत दुभंगलेला भारत आता बाहेरुन कमकुवत झालाय असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. (Divided internally India becomes weak externally says Rahul Gandhi)

राहुल गांधी यासंदर्भात ट्विट केलं असून आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, "देशांतर्गत दुभंगलेला भारत आता बाहेरुन कमकुवत झालाय. भाजपच्या लाजिरवाण्या धर्मांधतेनं आपल्याला केवळ एकाकी पाडलेलं नाही, तर जागतिक स्तरावर भारताचं स्थानही खराब केलं आहे"

भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी टीव्हीवरील एका डिबेट शोमध्ये बोलताना पैगंबरांबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्याचबरोबर दिल्ली भाजपचे मीडिया सेल प्रमुख नवीन जिंदाल यांनीही अशाच प्रकारच विधान केलं होतं. पण त्यांच्या या विधानावरुन जागतीक स्तरावर मोठं वादंग निर्माण झालं. आखाती देशानं या विधानावर आक्षेप घेत भारताला टार्गेट केलं आणि माफीची मागणी केली. जागतीक स्तरावरुन प्रतिक्रिया उमटायला लागल्यानंतर भाजपनं नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना पक्षातून निलंबित करत त्यांची प्रथमिक सदस्यता रद्द केली आहे.

दरम्यान, या प्रकरणावरुन देशभरातही मोठ्या प्रमाणावर टीका होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर सडकून टीकेचा सूर उमटत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT