Monkey Sakal
देश

दुर्मिळ सोनेरी वानरांचा अधिवास संकटात, जंगलतोड वाढल्याने संख्येत घट

गेल्या काही वर्षांत आसाममधील सोनेरी वानरांच्या अधिवासांचे नुकसान होत असून संख्येतही घसरण होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

रस्ते अपघात आणि जंगलतोडीमुळे दुर्मिळ होत असलेल्या सोनेरी वानरांच्या (ट्रॅचिपिथेकस गी) मृत्यू आणि जखमी होण्याचे प्रमाण वाढल्याने प्रायमेट संशोधन केंद्राकडून वन्यजीव मार्गावर कॉरिडॉर आणि कृत्रिम आच्छादन असलेले पूल बांधण्यात येत आहेत. प्रामुख्याने भारत भूतान सीमेवर वास्तव्य करणारी आणि झाडांच्या शेंड्यावर राहणारी सोनेरी वानरांची प्रजात भारताच्या पश्‍चिम आसामच्या चार जिल्ह्यांत आणि दक्षिण मध्य भूतानच्या सहा जिल्ह्यात आढळून येते.

गेल्या काही वर्षांत आसाममधील सोनेरी वानरांच्या अधिवासांचे नुकसान होत असून संख्येतही घसरण होत आहे. प्राचीन जीव संशोधन केंद्र, नॉर्थइस्ट इंडिया (एनजीओ) चे वरिष्ठ प्राचीन जीवशास्त्रज्ञ डॉ. जिओसुओ बिस्वास म्हणाले, सोनेरी वानरांच्या अधिवासांचे प्रमाण कमी होण्यामागे जंगलतोड हे कारण आहे. अलिकडच्या काळात जंगलाचे कृषी क्षेत्रात परावर्तित होत असून मानवी वस्ती देखील वाढत चालली आहे.

प्रामुख्याने आसामच्या कोक्राझार आणि बोंगाईगांव जिल्ह्यातील दक्षिण भागात सोनेरी वानरांचे वास्तव्य आहे आणि या भागातच अपघात आणि जंगलतोड वाढली आहे. डॉ. बिस्वास म्हणाले, या भागातील विकास कामे आणि बदलामुळे व्यापक प्रमाणात असलेले वनक्षेत्र आता तुकड्यातुकड्यात विभागले आहेत.एकुणातच सोनेरी वानरांच्या अस्तित्वाला नव्याने धोका निर्माण झाला आहे. या भागातील पायाभूत विकास कामे करताना सोनेरी वानरांच्या अधिवासाचा विचार केला गेला नाही.

शिवाय अपघात आणि शिकाऱ्यांमुळे त्यांचा मृत्युदर चिंताजनक राहिला आहे. बदलत्या वातावरणामुळे त्यांच्यावरील परिणाम आणि अधिवासाची कमतरता यामुळे संख्येत घट झाली आहे. २०१३ पासून नंदनगिरी अभयारण्य, नायकगांव, बक्सामारा-अमगुरी भागातील रबर गार्डन आणि चक्रशिला वन्यजीव अभयारण्य येथील रस्ते अपघात, वीजेचा धोका आणि सोनेरी वानरांतील विषाणूंचा प्रसार याची नोंद केली जात असल्याचे बिस्वास यांनी सांगितले.

एका अभ्यासानुसार, ७१ टक्के सोनेरी वानर हे जीवाची पर्वा न करता रस्त्यांवरून जाण्याचे धाडस करतात तर त्याचवेळी २९ टक्के प्रकरणात वाहनांपासून बचाव करण्यासाठी ते रस्ता बदलतात आणि उंच फांद्यावरून जाण्यास प्राधान्य देतात. काही भागातील मृत्यू दर कमी करण्यासाठी आणि जमिनीशी त्यांचा संपर्क वाढावा यासाठी काही यशस्वीरित्या पर्याय विकसित केले. जसे वन्यजीव मार्गाचे कॉरिडॉरची निर्मिती, कृत्रिम आच्छादनाचा पूल याचा समावेश आहे.

कोक्राझारमधील सिल्जन येथे शिडीचे चार पूल बांधण्यात आले. परंतु या वानरांनी सुरुवातीला या पुलाचा फारसा उपयोग केला नाही. तब्बल सहा महिन्यानंतर त्यांना खात्री पटल्यानंतरच पुलाचा वापर केला. पावसाळ्यात त्यांनी शिडीचा पूल वापरण्याचे टाळले आणि ते फांद्यावरून उड्या मारताना दिसले. जोखमीची ठिकाणे टाळली. कालांतराने शिडीचा पूल वापरण्यास सुरुवात केली. अर्थात जानेवारी २०२४ मध्ये वानरांचा कळप हा रस्त्यांच्या दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी नियमितरुपाने शिडी असलेल्या पुलाचा वापर करताना दिसून आले. त्यांच्या वर्दळीच्या काळातही लक्ष ठेवले गेले. सोनेरी वानरांचा कळप हा वीजविरोधक आच्छादन असलेल्या तारांचा आणि शिडीच्या पुलांच्या तुलनेत बाबूंच्या पुलाचा, पाइप पुलाचा अधिक वापर करताना दिसला.

वानरांच्या संचाराचा अभ्यास

उन्हाळ्यात बहुतांश वानरांनी शिडी असलेल्या पुलांचा वापर करत रस्ते ओलांडताना अनेकांनी पाहिले आहे. जून २०२२ ते फेब्रुवारी २०२४ या काळात एसएच-१४ रस्त्यांवर नायकगांव ते चराईबारी भागात होणाऱ्या अपघाताची नोंद केली. या अपघातात सहा वानरांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जणांना गंभीर मार लागला. त्यात पाय मोडणे, शेपटी तुटणे, हाताला इजा होणे यासारख्या घटनांचा समावेश आहे. सुदैवाने ते वाचले. अन्य सहा प्रकरणात प्राण्यांना धडक बसल्याने त्यांना किरकोळ जखमा झाल्या.

आजकाल मानव जबाबदार असलेले रस्ते अपघात हा प्राण्यांच्या मृत्युचे प्रमुख कारण मानले जात आहे. वन्यजीवांचा वीजेच्या धक्क्याने होणारा मृत्यु हा काही प्राण्यांच्या संख्येवर गंभीर परिणाम करणारा आहे.

- डॉ. जिओसिओ बिस्वास, अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT