Election Commission esakal
देश

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; आता जम्मू-काश्मीरमध्ये इतर राज्यातील लोकही मतदान करू शकणार!

जम्मू-काश्मीरच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी एक मोठा निर्णय जाहीर केलाय.

सकाळ डिजिटल टीम

जम्मू-काश्मीरच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी एक मोठा निर्णय जाहीर केलाय.

जम्मू-काश्मीरचे मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) हिरदेश कुमार (Hirdesh Kumar) यांनी एक मोठा निर्णय जाहीर केलाय. आयोगानं (Election Commission) काश्मीरबाहेरील लोकांनाही मतदानाचा अधिकार दिलाय.

यामध्ये सामान्यतः जम्मू-काश्मीरमध्ये राहणारे कर्मचारी, विद्यार्थी, मजूर किंवा देशातील इतर राज्यांतील व्यक्तींचा समावेश असणाप आहे. ते त्यांचं नाव मतदार यादीत नोंदवू शकतात. तसंच ते जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत मतदानही करू शकता.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार त्यांनी सांगितलं की, बाहेरील लोकांना मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी अधिवासाची आवश्यकता नाहीय. जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेले इतर राज्यांतील सशस्त्र दलाचे कर्मचारीही मतदार यादीत आपली नावं समाविष्ट करू शकतात, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

भाड्यानं राहणारे लोकही मतदान करू शकतील

स्थानिक नसलेल्यांना मतदान करण्यास प्रतिबंध नसल्याचं निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलंय. "जम्मू आणि काश्मीरमध्ये कोणी किती काळ राहतो हे महत्त्वाचं नाहीय. जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिक नसलेले लोक राहतात की नाही याचा अंतिम निर्णय ईआरओ घेईल. इथं भाड्यानं राहणारेही मतदान करू शकतात."

20 ते 25 लाख मतदार वाढण्याची शक्यता

हिरदेश कुमार पुढं म्हणाले, मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी एकच अट आहे की, त्या व्यक्तीनं त्याच्या मूळ राज्यातून मतदार नोंदणी रद्द केली असावी. आयोगाच्या या निर्णयामुळं सुमारे 20 ते 25 लाख नवीन मतदारांचा मतदार यादीत समावेश होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT