Election Commission
Election Commission esakal
देश

5 राज्यांतील निवडणुकांच्या तारखांची आज मोठी घोषणा

सकाळ डिजिटल टीम

निवडणूक आयोगानं यापूर्वी निवडणुका असणाऱ्या राज्यांची आढावा बैठक घेऊन तारीख जवळपास निश्चित केलीय.

Assembly Election 2022 : देशात कोरोनाचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव असला तरी, 5 राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक पुढं ढकलण्याची मागणी होत होती. मात्र, आता निवडणूक आयोग (Election Commission) आज (शनिवार) 5 राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार असल्याचं कळंतय. यात उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), उत्तराखंड (Uttarakhand), मणिपूर, गोवा (Goa) आणि पंजाबमधील (Punjab) निवडणुकांचा समावेश आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेश आणि पंजाबसह 5 राज्यांत 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरूय. निवडणूक आयोग लवकरच या राज्यांत होणाऱ्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आता आयोग आज दुपारी 3.30 वाजता तारखा जाहीर करणार असल्याचं समजतंय.

वास्तविक, निवडणूक आयोगानं यापूर्वी सर्व निवडणुका असणाऱ्या राज्यांची आढावा बैठक घेऊन तारीख जवळपास निश्चित केलीय. त्यामुळं निवडणूक कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सर्वात मोठं राज्य असणाऱ्या उत्तर प्रदेशात 8 टप्प्यात मतदान केलं जाऊ शकतं, तर पंजाबमध्ये 3 टप्प्यात मतदान केलं जाऊ शकतं. याशिवाय निवडणूक आयोग मणिपूरमध्ये (Manipur) दोन टप्पे, गोवा आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी एक टप्पा घेण्याची घोषणा करू शकतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नम्मांचा अपमान केला, बेळगावात मोदींचा घणाघात

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

SCROLL FOR NEXT