Mohan Bhagvat 
देश

Mohan Bhagwat: "भारताची एकता आणि अखंडता कायम ठेवा"; भागवतांच्या कानपिचक्या

कोणीतरी यांना समजवायला हवं असंही यावेळी भागवत यांनी म्हटलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारताची एकता आणि अखंडता कायम ठेवण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करायला हवेत अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी भाजपसह इतर नेत्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. भागवतांच्या या विधानामुळं अनेक चर्चाही सुरु झाल्या आहेत. (Everyone should make efforts for India unity and integrity says Mohan Bhagwat)

संघाच्या एका कार्यक्रमात बोलताना भागवत म्हणाले, "संपूर्ण जगात इस्लामंच आक्रमण झालं, स्पेनपासून मंगोलियापर्यंत हा धर्म पसरला. हळू हळू तिथले लोक जागे झाले त्यांनी आक्रमणकाऱ्यांचा पराभव केला, त्यामुळं इस्लामची पिछेहाट झाली.

सर्वांनी सर्वकाही बदलून टाकलं. आता विदेशी तर भारतातून निघून गेले पण इस्लामची पुजा सुरक्षित कुठे चालते ती इथेच चालते. किती शतकं झाली हे सहजीवन सुरु आहे. हे न ओळखता आपली भेदभेवांची निती चालवत असाल तर असं कसं चालेल" (Marathi Tajya Batmya)

कोणीतरी यांना समजवायला हवं ना. जर त्यांना पक्क हे समजलं असतं तर आम्ही वेगळे दिसतो म्हणून वेगळो आहोत या विचारानं देश तुटला नसता. सर्वांना हे कळणं गरजेचं आहे. ही मातृभूमी आमची आहे हे विसरुन आमच्या पुजा वेगवेगळ्या आहेत.

यामध्ये दोन चार विदेशी देखील आहेत. तरी देखील एका समाजाच्या नात्यानं आपण या देशाचे आहोत. आपले पूर्वज या देशाचे पूर्वज राहिले आहेत. या वास्तविकतेला आपण का स्विकार करु शकत नाही.

आपली जी विशिष्टता आणि विविधता आहे. ते आपल्या वेगळेपणाचं कारण बनत नाही इतर जगात ती होऊ शकते. आपल्या देशात प्राचीन काळापासून सर्वांना समन्वयानं सोबत घेऊन जाणारी संस्कृती कार्यरत आहे, असंही भागवत यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT