108 माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या एका गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात भाजप सरकारांद्वारे द्वेषाचे राजकारण केल्याचा आरोप केल्यानंतर, माजी न्यायाधीश, अधिकारी आणि सशस्त्र दलातील दिग्गजांच्या एका गटाने याला प्रत्युत्तर देत एक खुले पत्र जारी केलं आहे.
माजी न्यायाधीश, माजी प्रशासकीय अधिकारी आणि निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांच्या गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 108 माजी माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या खुल्या पत्राला उत्तर दिले आहे. आपल्या उत्तरात त्यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्राचा उद्देश पक्षपाती असल्याचे म्हटले आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की काही दिवसांपूर्वी108 माजी नोकरशहांच्या कॉन्स्टिट्यूशनल कंडक्ट ग्रुप (CCG) ने पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात द्वेषाच्या राजकारणाचा उल्लेख केला होता आणि भाजप सरकार सामान्य लोकांमध्ये द्वेष पसरवत असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या पत्रात माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदींवरही आरोप केले होते. तसेच हे त्वरित बंद करण्याची मागणी केली होती.
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील आठ माजी न्यायाधीश, 97 निवृत्त प्रशासकिय अधिकारी आणि सशस्त्र दलातील 92 निवृत्त अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी असलेल्या पत्रात CCG च्या पत्राविरोधात एक खुले पत्र लिहिले आहे.
एकूण 197 स्वाक्षऱ्या असलेल्या माजी न्यायाधीश आणि प्रशासकीयअधिकाऱ्यांच्या गटाने त्या माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या गटाला उत्तर दिले आहे, ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या खुल्या पत्रात "द्वेषाचे राजकारण" होत असल्या बद्दल चिंता व्यक्त केली होती. ज्यामध्ये त्यांच्यावर जनमतावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आणि त्यात सहभागाचा आरोप करण्यात आला होता. यावेळी, नव्या गटाने स्वत:ला 'चिंतीत नागरिक' म्हणवून घेत CCG ने पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्राची भाषा योग्य नसल्याचा आरोप केला आहे.
या पत्रातील स्वाक्षरीकर्त्यांनी पाचपैकी चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अलीकडील निवडणूक विजयाचा दाखला देत म्हटले की, हे पत्र म्हणजे त्या गटाचा पंतप्रधान मोदींच्या पाठिशी असलेल्या जनमताच्या विरोधात त्यांची निराशा व्यक्त करण्याचा मार्ग होता असे म्हटले आहे.
त्यांच्या काउंटर लेटरमध्ये, त्यांच्या राग आणि वेदने मागे चांगला उद्देश नाही, ते प्रत्यक्षात द्वेषाच्या राजकारणाला खतपाणी घालत आहेत. त्यांना त्यांचे पूर्वग्रह आणि सध्याच्या सरकारविरोधात खोटे चित्र उभे करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. CCG चे पत्र वैचारिक आधारावर पक्षपाती असल्याचे म्हटले आहे, संबंधित नागरिकांच्या गटाने आरोप केला की CCG ने पाश्चात्य माध्यमांच्या प्रपोगंडाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. पश्चिम बंगालमधील मतदानानंतरच्या हिंसाचारावर CCGकडून पाळण्याच आलेल्या कथित मौनावरही त्यांनी खोचकपणा केला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.