Facebook e sakal
देश

‘नियम मान्य’, केंद्राच्या डेडलाइनवर फेसबुकची प्रतिक्रिया

सूरज यादव

केंद्र सरकार 26 मेपासून नवीन नियम लागू करणार आहे. त्याचं पालन केलं नाही तर सोशल मीडिया कंपन्यांवर कारवाई होऊ शकते.

नवी दिल्ली - देशातील (India) सोशल मीडिया कंपन्यांना सरकारने नियमांचे पालन करण्यासाठी शेवटची मुदत दिली आहे. एक दिवस बाकी असताना फेसबुकने (Facebook) यावर प्रतिक्रिया दिली आहे. कंपनीने म्हटलं की, आम्ही सरकारच्या (India Govenrment) नियमांचे पालन करू, सध्या काही मदुद्यांवर चर्चा सुरु आहे. आमच्ये ध्येय आयटीच्या निमयाचे पालन करणे हे आहे आणि सध्या अशा काही मुद्द्यावर चर्चा सुरु आहे ज्यावर सरकारसोबत बोलण्याची गरज आहे. (facebook says we comply with the provisions of the IT rules)

फेसबुकच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, आयटीच्या नियमांनुसार आम्ही नियम लागू करण्यासाठी आणि सुधारणांसाठी काम करत आहे. आमच्या प्लॅटफॉर्मवर लोकांना स्वतत्रं आणि सुरक्षितपणे व्यक्त करता यावं यासाठी फेसबुक कटिबद्ध आहे.

केंद्र सरकार 26 मेपासून नवीन नियम लागू करणार आहे. त्याचं पालन केलं नाही तर सोशल मीडिया कंपन्यांवर कारवाई होऊ शकते. केंद्र सरकारने फेब्रुवारीमध्ये कंपन्यांना आदेश दिले होते. यासाठी तीन महिन्याची मुदतही देण्यात आली होती. 26 मे रोजी ही मुदत संपणार आहे. दरम्यान, सोशल मीडिया कंपन्यांकडून सरकारच्या नियमांचे पालन अद्याप करण्यात आलेले नाही. त्यामुळे दोन दिवसात केंद्राकडून कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने 25 फेब्रुवारीला भारताच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून डिजिटल कंटेटंवर नजर ठेवण्यासाठी तीन महिन्यांच्या आत कम्प्लायन्स अधिकारी आणि नोडल अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. या अधिकाऱ्यांचे कार्यक्षेत्र भारतापुरते मर्यादीत राहणार आहे. मात्र कंपन्यांनी केंद्राच्या या आदेशाकडे कानाडोळा केला आहे. फेसबुकने यावर मौन सोडलं असलं तरी ट्विटरकडून यावर कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup, IND vs PAK: भारताने शेवटच्या क्षणी पाकिस्तानशी खेळण्यास नकार दिला तर काय होईल? सुपर-४ मध्ये प्रवेश मिळेल का?

PM-Kisan Samman Nidhi : 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही किसान सन्मान निधीचा २१ वा हप्ता, नवी अपडेट समोर; तुमचं नाव तर नाही ना? असं करा चेक

Pune Crime:'विनापरवाना पिस्तूलाची स्टंटबाजी दोघा मित्रांना भोवली'; तळेगाव एमआयडीसीतील घटना, एक गंभीर जखमी तर दुसरा पोलीस कोठडीत

Pro Kabaddi 12: पुणेरी पलटनचा तेलुगू टायटन्सवर ३९-३३ ने दमदार विजय! गुणतालिकेत गाठलं अव्वल स्थान

Jejuri Theft News: अख्खं गाव चोराच्या पाठीमागे, अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलेच | Sakal News

SCROLL FOR NEXT