Rahul Gandhi_Bharat Jodo Yatra 
देश

Rahul Gandhi: आदि शंकराचार्यांनंतर राहुल गांधी दुसरे व्यक्ती जे...; फारुख अब्दुल्लांकडून कौतुक

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या जम्मू आणि काश्मीरमध्ये दाखल झाली असून यामध्ये फारुख अब्दुल्ला सहभागी झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राहुल गांधी यांची 'भारत जोडो' यात्रा सध्या जम्मू आणि काश्मीरमध्ये दाखल झाली आहे. या यात्रेत नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या पदयात्रेचं कौतुक केलं असून त्यांची तुलना थेट आदि शंकराचार्यांशी केली आहे. पण यामुळं आता वेगळ्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. (Farooq Abdullah compares Rahul Gandhi to Adi Shankaracharya)

जम्मू-काश्मीरच्या लखनपूर इथं भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यानंतर सभा पार पडली. या सभेत संबोधित करताना फारुख अब्दुल्ला म्हणाले, "आदि शंकराचार्यांनंतर राहुल गांधी हे पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर पदयात्रा केली आहे. अनेक दशकांपूर्वी शंकराचार्य इथं आले होते. जेव्हा इथं रस्ते नव्हते केवळ जंगलं होती, त्यावेळी शंकराचार्यांनी कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर हा खडतर प्रवास केला होता"

या यात्रेचा उद्देश भारताला जोडणे हा असून भारतात सध्या द्वेषाचं वातावरण निर्माण केलं जात असून एकमेकांवर धार्मिक चिखलफेक सुरु आहे. गांधी आणि राम यांचा भारत एक होता जिथे आपण सर्व एक होतो. ही यात्रा भारताला जोडण्याचा प्रयत्न करत आहे. या यात्रेचे शत्रू भारताचे, मानवतेचे आणि लोकांचे शत्रू आहेत, असंही यावेळी अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा - जगायचं कसं हे सांगण्यासाठी हवं 'लिव्हिंग विल'

खुर्शीद यांनी राहुल गांधींची केली होती रामाशी तुलना

यापूर्वी काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी राहुल गांधींची तुलना श्रीरामाशी केली होती. खुर्शीद म्हणाले होते, "राहुल गांधी एक अलौकिक व्यक्ती आहेत. आम्ही थंडीत गारठून गेलो असताना आणि थंडीपासून बचावासाठी जॅकेट घालत आहेत पण राहुल गांधी टी-शर्टमध्ये 'भारत जोडो यात्रे'त चालत आहेत. राहुल गांधी हे एका योगी सारखे आहेत जे एकाग्रतेनं 'तपस्या' करत आहेत.

श्रीनगरमध्ये होणार 'भारत जोडो'ची सांगता

'भारत जोडो यात्रा' गुरुवारी जम्मू-काश्मीरमध्ये दाखल झाली. कठुआच्या लखनपूर परिसरात या मोर्चानं प्रवेश केला. गुरुवारी संध्याकाळी या यात्रेत समर्थक मशाली घेऊन सहभागी झाले होते. फारुख अब्दुल्ला, पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती, नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही या यात्रेत सहभाग नोंदवला. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात कन्याकुमारीपासून भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली असून तिची सांगता ३० जानेवारीला श्रीनगरमध्ये होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT