high court e sakal
देश

लग्नासाठी धर्मांतर चुकीचं, कोर्टानं दिलं जोधा-अकबरचं उदाहरण

भाग्यश्री राऊत

लखनौ : फक्त लग्नासाठी धर्मांतर करणे चुकीचे आहे. धर्म हा आस्थेचा विषय आहे, असा निर्णय उत्तर प्रदेशातील अलहाबाद उच्च न्यायालयाने (allahabad high court) दिला. लव जिहादच्या (love jihad case) एका प्रकरणावर मंगळवारी सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयाने मुघल बादशाह अकबर आणि त्यांची पत्नी जोधाबाई यांचे उदाहरण सर्वांसमोर ठेवले.

जबरदस्तीने कोणाचे धर्मांतर केल्यास त्या धर्माबद्दल त्या व्यक्तीला आस्था नसते. असा निर्णय हा दबावाखाली घेतला जातो. फक्त लग्नासाठी कोणाचे धर्मांतर करणे चुकीचे असून याला कुठलीही संवैधानिक मान्यता नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. यावेळी बादशाह अकबर आणि जोधाबाई यांचे उदाहरण देखील न्यायालयाने दिले. अकबरने जोधाबाईंसोबत कुठलेही धर्मांतर न करता लग्न केले होते. दोघांनीही एकमेकांच्या धर्माचा सन्मान केला होता. तसेच धार्मिक भावनांचा आदर देखील केला होता. त्यामुळे दोघांच्याही नात्यामध्ये धर्म कधीच आडवा आला नाही, असेही न्यायालयाने म्हटले.

नेमक्या कोणत्या प्रकरणावर होती सुनावणी?

एटा जिल्ह्यातील जावेद नावाच्या व्यक्तीवर एका हिंदू मुलीचे जबरदस्तीने धर्मांतर करून लग्न केल्याचा आरोप आहे. मुलीने देखील तसा बयान दिला आहे. त्यामुळे जावेदला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याच्या जामिनासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावरच मंगळवारी सुनावणी घेण्यात आली असून न्यायालयाने त्याची जामिन याचिका रद्द केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMC Election: पुण्यात एकाच वार्डात शिवसेनेचे दोन AB फॉर्म! एका उमेदवाराने हातातून हिसकावला… फाडला… अन् गिळला! नेमकं काय घडलं?

Pune Municipal Election : आघाडीत बिघाडी, तर युतीत कुस्ती; खिरापतीसारखे एबी फॉर्म वाटल्याने पक्षांमध्ये अडचणी

Solapur News: द्राक्षबागायतदार संघ आक्रमक! पाच हजार टन बेदाणा भारतात आल्याचा संशय, सांगलीत चौकशी सुरू, अन्यथा आंदोलनाची तयारी!

केंद्र सरकारकडून नववर्षाची भेट! नाशिक-सोलापूरदरम्यान ‘ग्रीनफिल्ड कॉरिडॉर’; केंद्राकडून १९ हजार कोटींचा निधी!

Gopichand Padalkar : 'मराठी-कन्नड या दोन्ही भाषा माझ्यासाठी समान'; टीईटी परीक्षेबाबतही आमदार गोपीचंद पडळकरांचं महत्त्वाचं विधान

SCROLL FOR NEXT