Rajasthan 
देश

५०० रुपयांत सिलेंडर, १०० युनिट मोफत वीज ; राजस्थानने करुन दाखवले, महाराष्ट्रात कधी?

Sandip Kapde

देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महाराष्ट्रात गॅस सिलेंडरची किंमत गगनाला भिडली आहे. टोल दर, विज दरात देखील आजपासून वाढ होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजस्थान सरकाने मोठा निर्णय घेतला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने केलेल्या घोषणांचा आजपासून सर्वसामान्यांच्या जनजीवनावर थेट परिणाम होणार आहेत.

महिलांच्या बसमधील प्रवासाचे निम्मे भाडे, 100 युनिट वीज बिल माफ, महिलांना 500 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर, धान्य विक्रीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी असे मोठे बदल आजपासून राजस्थानमध्ये झाले आहेत.

हेही वाचा - महिलांनो तरुणपणी घेतलेली जमीन उतारवयात होईल आधार

राजस्थानमध्ये सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार उज्ज्वला योजनेतील कुटुंबांना आजपासून ५०० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर मिळणार आहे.रीफिलिंगसाठी दर महिन्याला फक्त ५०० रुपये भरावे लागतील,उर्वरित पैसे राज्य सरकार भरणार आहे.

तसेच यापूर्वी ५० युनिटपर्यंत वीज मोफत होती, मात्र अर्थसंकल्पात ती १०० युनिटपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही घोषणा आज १ एप्रिल २०२३ पासून लागू झाली आहे. महिलांसाठी आजपासून रोडवेज भाडे निम्मे करण्यात आले आहे. तसेच विशेष श्रेणीतील बसेसच्या भाड्यावर ३० टक्के सवलत देखील कायम राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China agreement : भारत-चीन करारामुळे नेपाळ संतप्त, डिप्लोमॅटिक नोट पाठविण्याची तयारी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 21 ऑगस्ट 2025

Israel War On Gaza: गाझातील इस्राइल करीत असलेला नरसंहार त्वरित थांबवा, सर्वपक्षीय नेत्यांची मागणी

गोष्ट एका ‘शिदोरी’ची

बोलताना ठेवा भान

SCROLL FOR NEXT