सर्वोच्च न्यायालय Esakal
देश

दिल्ली प्रदुषणावर सरकार काहीच करत नाही : सर्वोच्च न्यायालय

प्रदूषणाची पातळी जरी थोडी कमी झाली असली, तरी आम्ही या प्रकरणावरील काम बंद करणार नाही, असेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : दिल्ली एनसीआरमधील वायू प्रदुषणावर बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा सुनावणी सुरू केली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सरकारने प्रदूषण कमी करण्यासाठी काय काम केले, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला आहे. सुनावणीवेळी सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा म्हणाले की, 'समस्या ही आहे की न्यायालय काम करत आहे आणि सरकार काहीच काम करत नाही, अशी भावना नागरिकांची आहे. दरम्यान, काही वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या माहितीनुसार, प्रदुषण कमी करण्याबाबत न्यायालयाने उचललेल्या पावलांमुळे 40 टक्क्यांनी प्रदुषण कमी झाल्याचे म्हंटले आहे. मात्र, हे कितपत अचूक आहे हे माहीत नाही.'

प्रदुषणाचा स्तर कमी झाल्याने आता बांधकाम करण्याच्या कामाला परवानगी देण्यात यावी, यासाठी कामगारांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. उद्या शेतकरी आमच्याकडे मागणी करतील की, त्यांना कोळसा जाळण्याची परवानगी द्यावी. मात्र, प्रदूषणाची पातळी जरी थोडी कमी झाली असली, तरी आम्ही या प्रकरणावरील काम बंद करणार नाही, असेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले. तसेच यावर सुनावणी सुरू ठेवण्यात येणार आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तीन दिवसांचा दिला वेळ

दरम्यान, या प्रकरणावर यापुढेही न्यायालय आदेश देत राहिल, असेही न्यायाधीश एनव्ही रमण्णा यांनी सांगितले. ते म्हणाले की, आम्ही यावर दररोज किंवा प्रत्येक दिवशी सुनावणी घेऊ. यावेळी न्यायालयाने एअर क्वालिटी इंडेक्सवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सध्या एअर क्वालिटी इंडेक्स 381 आहे आणि सरकारने दिलेला आकडा 290 इतका आहे, त्यामुळे ही आकडेवारी योग्य असू शकत नसल्याचेही न्यायालयाने यावेळी सांगितले. सध्याच्या स्थितीत प्रदूषण थोडे कमी झाले असले तरी ते पुन्हा गंभीर स्थितीत पोहोचू शकते. ते कमी करण्याच्यादृष्टीने पुढील दोन ते तीन दिवसांत पावले उचलावी असेदेखील न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, या प्रकरणावरील पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

विहानला खेळायला जायचंय, तो येईल; बसवर झाड कोसळून मुलाचा मृत्यू, आई पाहतेय वाट, घरासमोरच घडली दुर्घटना

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

SCROLL FOR NEXT